प्रादेशिक बातम्या

August 4, 2026 8:01 PM

views 7

आळंदी पोलिसांकडून आंतरराज्य सायबर टोळीतील मुख्य म्यूल अकाउंट पुरवठादाराला अटक

ऑनलाइन गुंतवणूक आणि इतर आमिषं दाखवून देशातल्या ६५ नागरिकांची सुमारे १५० कोटीची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य सायबर टोळीतल्या मुख्य म्यूल अकाउंट पुरवठादाराला आळंदी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या ९ खात्यांमध्ये १ कोटी १५ लाख रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचं तपासात उघड झालं आहे.   आळंदीत एका बँके...

August 4, 2026 7:51 PM

views 7

राज्यात दत्तक प्रक्रिया पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री आदिती तटकरे यांचे निर्देश

राज्यात दत्तक प्रक्रिया पारदर्शक आणि वेळेत पूर्ण होण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयानं प्रलंबित प्रकरणं तातडीनं निकाली काढावीत, असे निर्देश महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहेत. मंत्रालयात दत्तक प्रक्रिया संदर्भात आढावा बैठक झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. राज्यात सध्या ६२ विशेष ...

August 4, 2026 7:38 PM

views 7

पीओपी मूर्तींवर यंदा बंदी नाही, परंतु टप्प्याटप्प्यानं बंदीचा सरकारचा निर्णय

पीओपी अर्थात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर यंदा बंदी घालता येणं शक्य नाही परंतु टप्प्याटप्प्यानं त्या बंद करू, असं आश्वासन राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात दिलं आहे. त्याचवेळी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या ६ फुटांपेक्षा जास्त उंचीच्या गणेश मूर्तींचं विसर्जन समुद्रात करण्याची परवानगी यंदाही द्यावी अशी व...

August 4, 2026 6:25 PM

views 7

बीएचएमएस डॉक्टरांच्या मान्यतेविरोधात मुंबई महापालिका रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा उद्यापासून बाह्यरुग्णसेवा बंदचा इशारा

बीएचएमएस डॉक्टर्सना मान्यतेच्या निषेधात आणि इतर मागण्यांसाठी मुंबई महानगरपालिका रुग्णालयातल्या निवासी डॉक्टरांनी उद्यापासून बाह्य रुग्णसेवा बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. होमिओपॅथीचा सीसीएमपी प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या बीएचएमएस डॉक्टर्सना महाराष्ट्र मेडीकल काऊन्सिलमधे नोंदणी करण्याची परवानग...

August 4, 2026 8:13 PM

views 37

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला तीन वर्षांची मुदतवाढ

 गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला राज्य सरकारनं आणखी तीन वर्षाची मुदतवाढ दिली आहे. यात अपघातात मृत्यू किंवा जखमी झालेल्या शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते. या योजनेत भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचा समावेश करायला राज्य मंत्रीमंडळानं आज झालेल्या बैठकी...

August 4, 2026 3:30 PM

views 5

राज्यातले माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या फेरविचार अर्जावर ६ महिन्यात निर्णय

राज्यातले माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या फेरविचार अर्जावर ६ महिन्यात निर्णय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयाला दिले आहे. कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगितीही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सुर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि व्ही. मोहना यांच्या खंडपीठानं कायम ठेवली. ९० च्या द...

August 4, 2026 1:35 PM

views 19

महाराष्ट्रात व्यसनमुक्तीविषयीचे धडे शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी प्रक्रिया सुरु करावी असे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

महाराष्ट्रात व्यसनमुक्तीविषयीचे धडे शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी प्रक्रिया सुरु करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत शालेय शिक्षण विभागाची आढावा बैठक झाली. शाळांची सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसंच विद्यार्थ्यांचं सायबर...

August 4, 2026 1:15 PM

views 24

डाबरच्या उत्पादनांच्या ‘100 टक्के’ दाव्यांवर FSSAIची कारवाई

अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं डाबर या खाजगी आस्थापनेला, मध, गायीचे तूप आणि खाद्य तेल यांच्यासंबंधी 100 टक्क्यांचा दावा करत विक्री करण्यास मनाई केली आहे. अशा प्रकारचा उल्लेख या कायद्याचा उल्लंघन करणार आहे. आहे. प्राधिकरणानं समाज माध्यमावरील संदेशाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी डाबर इंडिया ...

August 3, 2026 8:38 PM

views 13

पदपथावरचं अतिक्रमण हटवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, मुंबई महापालिकेकडून विशेष अभियान

सर्व रस्त्यांच्या कडेला, पायी चालणाऱ्यांसाठी व्यवस्थित आखून दिलेले आणि अतिक्रमण नसलेले पदपथ असतील, हे सुनिश्चित करावं, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकारला दिली. नागरिकांना धावणाऱ्या वाहनांची भीती न बाळगता चालता यायला हवं, असं न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या...

August 3, 2026 8:23 PM

views 12

पालघरमधील अतिवृष्टीग्रस्तांना राज्य सरकारची आर्थिक मदत जाहीर

जुलै महिन्यात पालघर जिल्ह्यातल्या अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांसाठी राज्य सरकानं आर्थिक मदत जाहीर केली आहे.  पूर्णपणे नष्ट झालेल्या घरांसाठी प्रत्येकी दीड लाख रुपये तर ५० टक्के नुकसान झालेल्या घरांना ५० हजार रुपये, २५ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या घरांना २५ हजार रुपये दिले जाणार आहे. पूर्णपणे नष्ट...