June 7, 2025 8:08 PM

views 67

शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. एनडीए सरकारच्या ११ वर्षांच्या कार्यकाळात कष्टकरी शेतकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळाली, हे सरकारचं भाग्य असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.    गेल्या ११ वर्षांत, विविध सरकारी उपक्रमांमुळे शेतकऱ्यांची समृद्धी वाढली असून, कृषी क्षेत्रात परिवर्तन घडून आलं. तसंच मातीचं आरोग्य आणि सिंचन यासारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे त्याचे चांगले परिणाम दिसत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आगामी काळातही शेतकऱ्यां...

May 12, 2025 2:55 PM

views 35

प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथे उच्चस्तरीय बैठक

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथे उच्चस्तरीय बैठक होत आहे. या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान, तिन्ही सशस्त्र दलांचे प्रमुख आणि अनेक वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत.    दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्या सैन्यदलाच्या डीजीएमओ मधलं आज दुपारी १२ वाजता नियोजित असलेलं संभाषण आज संध्याकाळी होणार असल्याचं वृत्त आहे.

May 8, 2025 1:42 PM

views 39

डोवाल यांनी नवी दिल्लीत प्रधानमंत्र्यांची त्यांच्या निवासस्थानी घेतली भेट

   राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आज नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर काल डोवाल यांनी जगभरातल्या नेत्यांशी संपर्क साधला  आणि पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतानं दहशतवादी तळांवर केलेल्या कारवाईची माहिती दिली.

May 5, 2025 1:26 PM

views 29

भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्र्यांची संरक्षण सचिवांबरोबर चर्चा

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत संरक्षण सचिव राजेश कुमार यांच्याशी महत्त्वपूर्ण चर्चा केली . प्रधानमंत्र्यांची काल नवी दिल्लीत हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंग यांच्याशी चर्चा झाली. 

April 29, 2025 3:35 PM

views 44

भारताची संशोधन परिसंस्था मजबूत करणं आवश्यक- प्रधानमंत्री

शिक्षण आणि नवोन्मेष क्षेत्रात देशाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि त्याला चालना देण्यासाठी, भारताची संशोधन परिसंस्था मजबूत करणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. विकसित भारतासाठी शिक्षण, उद्योग आणि नवोन्मेष क्षेत्राला एकत्रित आणणाऱ्या युग्म संमेलनात ते बोलत होते. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं हे संमेलन होत आहे.   या तिनही क्षेत्रात सरकार करत असलेल्या कामांची, आणि भविष्यातल्या योजनांची माहिती मोदी यांनी यावेळी दिली. युग्म अर्थात - Youth, University, Government, and Mar...

April 26, 2025 3:03 PM

views 53

देशातले तरुण कठोर परिश्रमातून राष्ट्राची सक्षमता जगाला दाखवत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

 देशातले तरुण आपल्या कठोर परिश्रम आणि नवनवीन उपक्रमांमधून राष्ट्र किती सक्षम आहे हे जगाला दाखवून देत आहेत, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राष्ट्रीय रोजगार मेळाव्यात विविध सरकारी विभागांमध्ये नवनियुक्त ५१ हजारांहून अधिक तरुणांना दूरस्थ पद्धतीनं आज मोदी यांनी नियुक्ती पत्रं वाटली, त्यानंतर ते बोलत होते.   अर्थसंकल्पात सरकारनं उत्पादन अभियानाची घोषणा केली असून त्याचं उद्दिष्ट ‘मेक इन इंडियाला प्रोत्साहन देणं, देशातल्या तरुणांना जागतिक दर्जाची उत्पादनं बनवण्याची संधी दे...

April 25, 2025 2:41 PM

views 26

प्रधानमंत्री २७ एप्रिल रोजी ‘मन-की-बात’ कार्यक्रमातून नागरिकांशी साधणार संवाद

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या २७ एप्रिल रोजी आकाशवाणी वर ‘मन-की-बात’ कार्यक्रमाच्या माध्यमातून देश-विदेशातल्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सादर होणाऱ्या या कार्यक्रमाचा हा १२१ वा भाग असेल.   नागरिकांनी त्यांचे विचार आणि सूचना १८००-११-७८०० या टोल फ्री क्रमांकाद्वारे पाठवाव्यात, असं आवाहन करण्यात आलं आहे. आकाशवाणी, दूरदर्शन, तसंच प्रसारण मंत्रालयाच्या युट्युब चॅनल वरून मन-की-बात या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण होणार असून त्यानंतर लगेचच विविध प्रादेशिक भाषांम...

April 23, 2025 8:14 PM

views 39

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्रीमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीची बैठक सुरू

पहलगाम इथल्या दहशतवादी  हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्लीतल्या निवासस्थानी मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीची बैठक सुरू आहे. या बैठकीत गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल उपस्थित आहेत.    या दहशतवादी हल्ल्यात राज्यातल्या एकूण ६ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यातले डोंबिवलीचे संजय लेले आणि पनवेलचे दिलीप डिसले यांचं पार्थिव मुंबईत पोहोचलं आहे. हेमंत जोशी आणि अतुल मोने यांचं पार्थिव मुंबईत आणि कौस्तुभ गणवते ...

April 22, 2025 9:50 AM

views 52

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष आणि प्रधानमंत्री मोदी यांच्यात द्वीपक्षीय मुद्दयावर चर्चा 

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स यानी काल नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. उभय नेत्यांनी द्वीपक्षीय सहकार्याच्या विविध क्षेत्रातल्या प्रगतीचा आढावा घेतला. ऊर्जा, संरक्षण, धोरणात्मक तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांचीही त्यांनी नोंद घेतली.   तसंच परस्पर हिताच्या विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही विचारांची देवाणघेवाण केली. प्रधानमंत्र्यांनी व्हान्स यांच्या सन्मानार्थ मेजवानीचंही आयोजन केलं होतं. जेडी व्...

April 11, 2025 1:17 PM

views 55

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उत्तरप्रदेशातल्या 3 हजार ८८० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं उद्घाटन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. तीन हजार ८८० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन त्यांच्या हस्ते वाराणसी इथं झालं. या प्रकल्पांमध्ये वाराणसीमध्ये पायाभूत सुविधांचा विकास आणि रस्ते जोडणी प्रकल्पांचा समावेश आहे.   वाराणसी रिंग रोड आणि सारनाथ दरम्यानचा रस्ते प्रकल्प, विद्युत क्षेत्रातील पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठीचा प्रकल्प, वाराणसी विभागात जौनपूर, चंदौली आणि गाजीपूर जिल्ह्यांमध्ये एक हजार ४५ कोटी रु...