June 21, 2024 8:17 PM

views 62

जहाल नक्षलवादी संजय उर्फ बीच्छेम सुकलू पूनेमचं गोंदिया पोलिसांपुढं आत्मसमर्पण

२ हजार १३ सालापासून माओवादी चळवळीत सक्रिय असलेल्या, सालेकसा तालुक्यातल्या पोलिसांच्या चकमकीत सहभाग असलेल्या जहाल नक्षलवाद्यानं, गोंदिया पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं आहे. संजय उर्फ बीच्छेम सुकलू पूनेम असं आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्याचं नाव असून तो मूळचा छत्तीसगढचा आहे. शासनानं त्याच्यावर ७ लाखाचं  बक...

June 21, 2024 8:14 PM

views 49

नागरिकांनी नदी, नाल्यांमध्ये कचरा किंवा राडारोडा न टाकण्याचे मुंबई महानगरपालिकेचे आवाहन

बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं नाल्यातला गाळ काढण्याचं काम नियमितपणे केलं जातं. पावसाळापूर्व काळात मुंबई शहरातल्या लहानमोठ्या नाल्यांतला गाळ काढण्यात आला आहे. परंतु, नाल्यांमध्ये आसापासच्या नागरिकांकडून वारंवार कचरा टाकला जात असल्याचं  आढळून येतं. नदी, नाल्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा कचर...

June 21, 2024 8:06 PM

views 53

काश्मीरमध्ये लवकरच उभारणार महाराष्ट्र सदन

काश्मीरमध्ये लवकरच महाराष्ट्र सदन उभारण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागानं घेतला आहे. यासाठी जमीन खरेदी करण्यासाठी विभागानं ९ कोटी ३० लाख २४ हजार रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली.  जम्मू आणि काश्मीर सरकारनं बडगाम जिल्ह्यातल्या इच्चगाम ...

June 21, 2024 7:59 PM

views 84

नाना पटोले यांनी केली अटल सेतूची पाहणी

शिवडी न्हावा शेवा प्रकल्पावर राज्य सरकारनं १८ हजार कोटी रुपये खर्च केला असून यासाठी बँकेकडून कर्ज काढलं आहे, हा काही विकास नाही तर भ्रष्टाचार असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज केला. पटोले यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींबरोबर अटल सेतूची पाहणी केली आणि रस्त्याला भेगा पडल्य...

June 21, 2024 7:55 PM

views 66

केंदीय कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रासह १० राज्यांच्या कृषी मंत्र्यांची आणि अधिकाऱ्यांची एकत्रित परिषद

केंद्र सरकारच्या धोरणानुसार डाळीच्या उत्पादनात आणखी वाढ करण्यासाठी राज्यात कृषी विद्यापीठातलं संशोधन, प्रगत शेती, सुधारित वाणांचा तसंच पाणी आणि खत वापराचं सुयोग्य नियोजन केलं जाईल, असं कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज सांगितलं. देशात डाळींच्या उत्पादनात आत्मनिर्भरता मिळवण्यासाठी काय काय करता येईल याव...

June 21, 2024 7:36 PM

views 57

नंदूरबार आणि धुळे जिल्ह्याचा काही भाग वगळता राज्यात सर्वत्र नैऋत्य मौसमी पाऊस दाखल

उत्तर महाराष्ट्रात नंदूरबार आणि धुळे जिल्ह्याचा काही भाग वगळता राज्यात सर्वत्र नैऋत्य मौसमी पावसाचं आगमन झालंय.  गेल्या चोवीस तासात कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली.  रत्नागिरीत झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातल्या नद्यांची पाणीपातळी वाढली आहे. पालघर जिल्ह्यात काल मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्यातल्या सूर्...

June 21, 2024 7:29 PM

views 40

आकाशवाणी बातम्यांच्या विश्वासार्हतेच्या बाबतीत अग्रगण्य स्थानावर

आकाशवाणीनं विश्वासार्ह बातम्या देण्याची ओळख जपलेली आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या रॉयटर्स इन्स्टिट्यूट फॉर स्टडी ऑफ जर्नालिझमच्या ताज्या वार्षिक सर्वेक्षणात आकाशवाणीच्या बातम्यांच्या विश्वासार्हतेच्या बाबतीत असलेल्या अग्रगण्य स्थानावर शिक्कामोर्तब केलं आहे.  कोणत्याही परिस्थितीत वास्तव बातम्या देण्याच...

June 21, 2024 7:24 PM

views 61

मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे ज्येष्ठ पत्रकार लता राजे यांना प्रतिष्ठेचा युगारंभ पुरस्कार प्रदान

मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे ज्येष्ठ पत्रकार लता राजे यांना प्रतिष्ठेचा युगारंभ पुरस्कार आज प्रदान करण्यात आला. पत्रकार संघाच्या ८३ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाला ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे उपस्थित होते. ज्येष्ठ छायाचित्रकार संतोष बने, ज्येष्ठ पत्रकार विजय कुमार बांदल, पत्रकार पंकज ...

June 21, 2024 7:19 PM

views 59

जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकल्पाचं काम पुढे नेणार नसल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकल्पाचं काम पुढे नेणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज समाजमाध्यमावर दिली. नागपूर-गोवा जोडणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाविरोधात सध्या आंदोलन सुरु आहे. त्यासंदर्भात ते बोलत होते.  हे सरकार सर्वसामान्य जनतेचं आहे, त्यामुळे जनतेच्या भावनेचा विचार ...

June 21, 2024 6:21 PM

views 56

महायुती सरकारविरोधात काँग्रेसचं राज्यभर ‘चिखल फेको’ आंदोलन

महायुती सरकारविरोधात काँग्रेसनं आज राज्यभरात चिखल फेको आंदोलन केल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. केंद्रातलं आणि राज्यातलं भाजपा आघाडीचं सरकार जनतेला वाऱ्यावर सोडून मजा मारत आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली आहे, महागाई, बेरोजगारीनं लोकांना जगणं कठिण झालं ...