February 2, 2025 8:09 PM

views 64

भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या टी-२० क्रिकेट मालिकेतला पाचवा सामना मुंबईत सुरु / अभिषेक शर्मानं झळकावलं ३७ चेंडूत शतक

भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या टी-२० क्रिकेट मालिकेतला पाचवा आणि शेवटचा सामना आज मुंबईत वानखेडे सेटेडिअमवर होत आहे. इंगलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. भारताचा सलामीचा फलंदाज संजू सॅम्सन फटकेबाजी करताना १६ धावांवर बाद झाला. मात्र अभिषेक शर्मानं ३७ चेंडूत शतक ठोकलं. शेव...

February 2, 2025 7:48 PM

views 14

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मध्य प्रदेशाच्या आशी चौकसे हिनं महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन नेमबाजी प्रकारात सुवर्ण पदक जिंकून राष्ट्रीय विक्रम मोडित

देहरादून इथं सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मध्य प्रदेशाच्या आशी चौकसे हिनं महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन नेमबाजी प्रकारात सुवर्ण पदक जिंकून राष्ट्रीय विक्रम मोडित काढला. आशीने २०२३च्या हांगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत ५० मीटर रायफल थ्री पोझिशन्स प्रकारात रौप्य पदक पटकावलं होतं. दरम्या...

February 2, 2025 7:45 PM

views 50

महानुभाव पंथाच्या राज्यातल्या सर्व प्रमुख श्रद्धास्थळांचा विकास करायचा संकल्प सरकारनं केला – मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस

महानुभाव पंथाच्या राज्यातल्या सर्व प्रमुख श्रद्धास्थळांचा विकास करायचा संकल्प सरकारनं केला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी सांगितलं. नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव इथल्या श्रीकृष्ण देव उखळाई मंदिराच्या नवपर्व आणि कलशारोहण सोहळ्यात ते आज बोलत होते. चक्रधऱ स्वामी आणि त्यांच्या अनुयायांनी विपरित...

February 2, 2025 7:43 PM

views 55

राज्यात १५ ते १६ वर्ष वयोगटातली ९८ टक्के मुलं शाळेत जात असून शाळाबाह्य मुलांचं प्रमाण सर्वात कमी असलेल्या राज्यांमधे महाराष्ट्राचा समावेश

राज्यात १५ ते १६ वर्ष वयोगटातली ९८ टक्के मुलं शाळेत जात असून शाळाबाह्य मुलांचं प्रमाण सर्वात कमी असलेल्या राज्यांमधे महाराष्ट्राचा समावेश होतो. अशी माहिती शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे. प्रथम एज्युकेशन फाउंडेशन या संस्थेतर्फे राज्याच्या ग्रामीण भागातल्या शाळांचा सर्वेक्षण अहवाल - असर - प...

February 2, 2025 7:41 PM

views 17

भारतीय तटरक्षक दलाच्या पश्चिम विभागातर्फे ‘सुरक्षित तट’ या नावाने एक सायकल सफर आयोजित

भारतीय तटरक्षक दलाच्या पश्चिम विभागातर्फे ‘सुरक्षित तट’ या नावाने एक सायकल सफर आयोजित करण्यात आली आहे. तटरक्षक दलाच्या दमण विभागाच्या कमांडिंग ऑफिसरनी या सफरीचं आज उदघाटन केलं. या सफरीत सहभागी झालेले २० सायकलस्वार गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि गोवा या राज्यांच्या किनारपट्टीवर २१ दिवसांमध्ये ...

February 2, 2025 7:27 PM

views 51

नवी दिल्लीत आकाशवाणी भवन इथं ‘हर कंठ में भारत’ हा विशेष शास्त्रीय संगीत कार्यक्रम सुरू

सांस्कृतिक मंत्रालयानं आकाशवाणीच्या सहकार्यानं आज नवी दिल्लीत आकाशवाणी भवन इथं 'हर कंठ में भारत' हा विशेष शास्त्रीय संगीत कार्यक्रम सुरू केला. हा कार्यक्रम आजपासून १६ फेब्रुवारीपर्यंत दररोज २१ आकाशवाणी केंद्रांवरून सकाळी साडेनऊ ते १० वाजेपर्यंत थेट प्रसारित केला जाईल. या कार्यक्रमात शास्त्रीय संगीता...

February 2, 2025 3:22 PM

views 38

38व्या राष्ट्रीय क्रीडास्पर्धांमधे महाराष्ट्राला सर्वाधिक ४१ पदकं प्राप्त

उत्तराखंडमधे सुरु असलेल्या 38व्या राष्ट्रीय क्रीडास्पर्धांमधे आतापर्यंत महाराष्ट्राने सर्वाधिक  ४१ पदकं मिळवली असून त्यात  ११ सुवर्णपदकं आहेत.   सेनादलांचा संघ सर्वाधिक १४ सुवर्णपदकं मिळवून अव्व्ल स्थानी आहे.  कर्नाटक १३ सुवर्णपदकांसह २३ पदकं मिळवून दुसऱ्या स्थानावर आहे. स्क्वॅशचा अंतिम सामना महाराष...

February 2, 2025 3:38 PM

views 68

आज जागतिक पाणथळ जागा दिन

आज जागतिक पाणथळ जागा दिन आहे. अशा जागांचं  संरक्षण आणि त्याबाबतची आस्था व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा करायची प्रथा १९७१ सालापासून सुरु आहे. इराणच्या रामसर शहरात २ फेब्रुवारी १९७१ रोजी या दिवसानिमित्त पहिलं रामसर अधिवेशन झालं होतं. वनस्पती आणि इतर सूक्ष्म जीवांचा अधिवास असलेल्या जल परिसंस्था या केव...

February 2, 2025 3:08 PM

views 13

देशभरात आज वसंत पंचमी साजरी

देशभरात आज वसंत पंचमी साजरी होत आहे. या दिवशी विद्येची देवता सरस्वती देवीची पूजा केली जाते, तसंच वसंत ऋतूचं स्वागत करून निसर्गातील नवनिर्मितीचा उत्सव साजरा केला जातो.    शिक्षण आणि ज्ञानाचं महत्व सांगणारा तसंच समृद्धी आणि आनंदाचा उत्सव साजरा करणारा हा दिवस असून सर्व देशवासियांना शुभेच्छा देत अस...

February 2, 2025 3:40 PM

views 42

यंदाचा अर्थसंकल्प तयार करताना करांमधे सवलत देण्याचं उद्दिष्ट-सीतारामन

देशातल्या प्रामाणिक करदात्यांमुळे अर्थव्यवस्थेला मोलाचं योगदान मिळत असून त्यांच्याकरता करांमधे सवलत देण्याचं उद्दिष्ट यंदाचा अर्थसंकल्प तयार करताना होतं असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. २०२५-२६ या वर्षाचा अर्थसंकल्प काल संसदेत सादर झाल्याच्या पार्श्वभूमीवर पीटीआय या वृत्तसं...