August 7, 2026 8:59 PM

views 53

राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त देशातल्या २२ कारागीरांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान

 बारावा राष्ट्रीय हातमाग दिवस आज देशभरात साजरा होत आहे. ७ ऑगस्ट १९०५ रोजी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा एक भाग म्हणून स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आली. त्याची आठवण म्हणून दरवर्षी हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून साजरा होतो. या निमित्ताने वस्त्रोद्योग मंत्रालयाने राष्ट्रपती भवनात आज विशेष कार्यक्रम आयोजित केला होता.   या कार्यक्रमात देशभरातल्या २२ हातमाग कारागीरांना संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. २०२५ या  वर्षा...

March 22, 2025 10:06 AM

views 58

एम्सचा 49वा दीक्षांत समारोह सोहळा राष्ट्रपतींच्या हस्ते पार पडला

मानसिक आरोग्याशी निगडीत जागरुकता मोहीम राबवून नागरिकांना या सुप्त आजाराची जाणीव करून देण्याचे आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी काल दिल्लीत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था म्हणजेच एम्सच्या अधिकारी, प्राध्यापकांना केलं.   भावनिक आरोग्य हे एक महत्त्वाचे आव्हान झाल्याचे त्या म्हणाल्या. एम्सचा 49 वा दीक्षांत समारोह सोहळा राष्ट्रपतींच्या हस्ते काल पार पडला त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी केंद्रीय आरोग्य कल्याण मंत्री जे पी नड्डा यांनी एम्सने कृत्रिम बुद्धिमत्ता संचलित रोगनिदान आणि यंत्रमान...

March 22, 2025 9:44 AM

views 57

वंचित वर्गाप्रती संवेदनशीलता ही देशाची प्रतिष्ठा – राष्ट्रपती

वंचित वर्गाप्रती असलेली संवेदनशीलता ही समाजाची आणि देशाची प्रतिष्ठा ठरवते, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. त्या काल राष्ट्रपती भवनात आयोजित पर्पल फेस्ट कार्यक्रमाला संबोधित करताना बोलत होत्या. करुणा,सर्वसमावेशकता आणि सलोखा ही भारतीय संस्कृतीची मूल्ये असून अपंगत्वाचा लोकांच्या जीवनावर होणारा परिणाम याविषयी जनजागृती करणं आणि अपंग व्यक्तींना समाजात समजून घेणं, स्वीकारणं हा 'पर्पल फेस्ट'चा उद्देश असल्याचं राष्ट्रपती मुर्मू यावेळी म्हणाल्या.     सामाजिक न्याय आणि अधि...

July 6, 2024 1:04 PM

views 68

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून ४ दिवस ओदिशा दौऱ्यावर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून चार दिवसांच्या ओदिशा दौऱ्यावर आहेत. त्या उद्या पुरी इथं भगवान जगन्नाथ, भगवान बालभद्र, सुभद्रा देवी आणि भगवान सुदर्शन यांच्या रथ यात्रेत सहभागी होणार आहेत. त्या आज संध्याकाळी भुवनेश्वर इथं उत्कलमणी गोपालबंधू दास यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.   सोमवारी त्या ऐतिहासिक उदयगिरी आणि खंडगिरी गुंफांना भेट देऊन नंतर बिभूती कानूंगो महाविद्यालय आणि उत्कल विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. मंगळवारी दिल्लीला परतण्यापूर्वी ...