September 24, 2025 3:28 PM

views 47

आवश्यक तिथे नियम शिथिल करुन तातडीने मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

राज्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भागात नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्र्याचे दौरे सुरु झाले आहेत.  मराठवाडा, सोलापूर, अहिल्यानगर इथं गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री बांधावर जाऊन पाहणी करत आहेत. आपत्तीच्या काळात आवश्यक तिथे नियम शिथिल करुन तातडीने मदत वितरित करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.    म...

September 24, 2025 1:24 PM

views 129

शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार प्रयत्नशील – कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

महाराष्ट्रात मराठवाडा, सोलापूर, अहिल्यानगर इथं गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचं हातातोंडाशी आलेलं पीक पाण्यात गेलं असून त्यांचं मोठं नुकसान झालं. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री बांधावर जाऊन पाहणी करत आहेत,    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील निमगाव आणि सिना दारफळ या गावांना भेट देत पूरस्थितीची पाहणी केली. दुपारी ते लातूर आणि धाराशी...

September 23, 2025 8:10 PM

views 163

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना २,२१५ कोटी रुपये मदत करण्याचे शासन आदेश

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागातल्या ३१ लाख ६४ हजार शेतकऱ्यांना दोन हजार २१५ कोटी रुपये मदत करण्याचे शासन आदेश दिले असून १ हजार ८२९ कोटींची मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहचल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी सांगितलं. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर  ते वार्ताहरांशी बोलत होते. उर्वरित रक्कम येत्या दहा दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. मदत जाहीर करण्याची प्रक्रिया निरंतरपणे चालू राहणार असून यापुढेही मदत निधीचे जीआर वितरीत केले जातील, असही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.    अहिल्यानगर, सोलापूर, ...

September 23, 2025 2:55 PM

views 79

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई मिळेल अशी कृषीमंत्र्यांची ग्वाही

अतिवृष्टीमुळे ७० लाख एकरावरच्या पिकांचं नुकसान झालं असल्याचा अंदाज कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत व्यक्त केला. जिथे अद्याप पंचनामे झालेले नाहीत किंवा  आणखी नुकसानी झालेली असण्याची शक्यता आहे तिथे शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत पोहोचवली जाईल असं आश्वासन भरणे यांनी दिलं.    राज्यात गेल्या काही दिवसात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती उद्भवली असून अनेक ठिकाणी पिकांचं नुकसान झालं आहे. तसंच पशुधन वाहून घेलं असून घरांचही नुकसान झालं असल्यानं राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्य...

September 22, 2025 2:43 PM

views 112

राज्यात जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

राज्यात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झालं आहे.    धाराशिव जिल्ह्यात परंडा तालुक्यातल्या साकत गावात मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून परिस्‍थितीचा आढावा घेतला आणि या गावात  अडकलेल्या १२ नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सैन्यादलाच्या हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्याचे निर्देश पवार यांनी दिले.   बीड जिल्ह्यतल्या माजलगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला आहे. पावसाम...

September 21, 2025 7:28 PM

views 64

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ६८९ कोटी रुपयांचा मदतनिधी मंजूर

नांदेड, परभणी, सातारा आणि सांगली जिल्ह्यातल्या पूर आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी नुकसानभरपाई म्हणून राज्य सरकारनं ६८९ कोटी रुपयांचा मदतनिधी मंजूर केला आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी आज ही घोषणा केली. जून ते ऑगस्ट २०२५ या काळात अतिवृष्टीनं बाधित या चार जिल्ह्यांमध्ये सरकारी यंत्रणेने तातडीनं पंचनामे करून अहवाल पाठवल्यामुळे ही मदत त्वरित मंजूर केल्याचं जाधव पाटील म्हणाले.    या मदतीचं वाटप करताना शेतकऱ्यांच्या पूर्वीच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी मदतनिधीचा वापर करू नय...

September 21, 2025 6:50 PM

views 65

राज्यात ‘नमो युवा रन फॉर नशा मुक्त भारत’ कार्यक्रमाचा प्रारंभ

कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रभावी अंमलबजावणीनं  देश महासत्तेकडे वाटचाल करू शकतो. त्यामुळे राज्यात पोलीस व्यवस्थेच्या सुधारणांवर भर देण्यात आला असून सायबर सुरक्षेबरोबरच अमली पदार्थ संदर्भातल्या गुन्ह्यांप्रकरणी  राज्य शासनानं ‘झिरो टॉलरन्स धोरण’ अवलंबलं असल्याचं  प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी केलं आहे. भाजपा युवा मोर्चाच्या 'नमो युवा रन फॉर नशा मुक्त भारत' कार्यक्रमाचा प्रारंभ मुख्यमंत्र्यांनी आज मुंबईत केला, त्यावेळी ते बोलत होते. ‘नशामुक्त भारत, नशामुक्त महाराष्ट्र आणि नशामुक्त मुं...

September 19, 2025 7:00 PM

views 36

शिक्षण उपक्रमांना चालना देणाऱ्या जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांना कोटींचं पारितोषिक

गुणवत्तापूर्ण आणि नाविन्यपूर्ण शिक्षण उपक्रमांना चालना देण्यासाठी काम करणाऱ्या जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांना ५ कोटी, ३ कोटी आणि २ कोटी रुपयांची प्रोत्साहनपर पारितोषिकं देण्यात येतील, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी आज पुण्यात केली. राज्यस्तरीय शालेय शिक्षण परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. विद्यार्थ्यांना ऐतिहासिक स्थळांचं महत्त्व कळावं, शेतीतील कामांचं निरीक्षण करता यावं, बँकेचे व्यवहार समजावेत यासाठी शैक्षणिक सहली काढण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

September 19, 2025 6:45 PM

views 68

नवे उद्योग उभारणीसाठी लागणारे परवाने कमी करून वेळेची बचत करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

नवीन उद्योग उभारणीसाठी लागणारे परवाने कमी करून वेळेची बचत करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत घेतलेल्या बैठकीत दिले. उद्योगांसाठीच्या सुधारणांची अंमलबजावणी करु नवे उद्योग सुरू करण्यासाठी जलद आणि सुलभ परवाने देणारं उत्कृष्ट उदाहरण देशासमोर ठेवण्याचं आवाहन त्यांनी केलं.    उद्योगासाठी लागणाऱ्या बऱ्याच परवानग्या अनेक विभागांशी संबंधित असतात. अशावेळी एकाच अर्जामध्ये संबंधित सर्व परवानग्या देण्याची व्यवस्था करावी.  पुन्हा अर्ज करण्याची वेळ उद्योजकावर येणार नाही, याची काळज...

September 19, 2025 6:56 PM

views 28

विविध स्टील कंपन्यांबरोबर राज्य सरकारचे ८१ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार

मुंबईत आज आयफा स्टील महाकुंभ या कार्यक्रमात महाराष्ट्र शासनानं विविध स्टील कंपन्यांबरोबर जवळपास ८१ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या करारांमुळे ४० हजारापेक्षा जास्त रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, रायगड, छत्रपती संभाजीनगर, साताऱ्यात हे प्रकल्प येणार आहेत. यातून राज्यातल्या स्टील उद्योगाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.                              मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि केंद्...