September 30, 2025 4:56 PM

views 106

राज्यात पूरग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा ओघ सुरू

राज्यात अनेक ठिकाणी पाऊस ओसरला असून पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी विविध धरणांमधून विसर्ग करण्यात येत आहे. जायकवाडी प्रकल्पातून सध्या १ लाख २ हजार क्युसेक्स इतका विसर्ग सुरू आहे. राज्यात पूरग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा ओघही सुरू झाला आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत म्हणून धाराशिव जिल्ह्यातल्या उमरगा तालुक्यातल्या माऊली प्रतिष्ठानने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १ लाख १ हजार १११ रुपये दिले आहेत. धाराशिव जिल्ह्यात लोहारा तालुक्यात नागुर इथे पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या बाल...

September 30, 2025 4:49 PM

views 181

राज्य मंत्रिमंडळ निर्णय

राज्य सरकार कर्करोग उपचारासाठी सर्वसमावेशक असं धोरण आखून प्रत्येक जिल्ह्यात नागरिकांना कर्करोगावर दर्जेदार उपचार उपलब्ध करुन देणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय झाला. त्यानुसार त्रिस्तरीय समग्र कर्करोग उपचार सेवा निश्चित केली जाईल. राज्यभरात १८ रुग्णालयांमधे कर्करोगाशी निगडीत विशेषोपचार उपलब्ध होतील. यासाठी १०० कोटी रुपये भाग भांडवलाची महाकेअर, अर्थात महाराष्ट्र कॅन्सर केअर, रिसर्च अँड एज्युकेशन फाऊंडेशन ही कंपनी स्थापन केली जाणार आहे.    औद्योगिक, वाणिज्यिक आण...

September 30, 2025 12:22 PM

views 39

अतिवृष्टीग्रस्तांसाठी सिद्धिविनायक मंदिरातर्फे कोटींची मदत

राज्यातल्या अतिवृष्टीग्रस्तांसाठी मुंबईच्या श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासानं  १० कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये गेले काही दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांमधलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. तसंच शेतीचं आणि नागरिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचं मंदिर न्यासानं  म्हटलं आहे.

September 29, 2025 3:10 PM

views 108

अतिवृष्टीमुळं ४१ हजारांपेक्षा अधिक नागरिक स्थलांतरित

अतिवृष्टीमुळं राज्यातले ४१ हजारांपेक्षा अधिक नागरिक स्थलांतरित झाले आहेत, अशी माहिती राज्य सरकारनं दिली आहे. सर्वाधिक १३ हजारांहून अधिक नागरिक सोलापूरात स्थलांतरित झाले आहेत. तर जालन्यात साडे ८ हजार, छत्रपती संभाजीनगरमध्ये ८ हजारांहून अधिक आणि धाराशिवमध्ये सुमारे ४ हजार नागरिक स्थलांतरित झाले आहेत. गेल्या २४ तासात पुरात वाहून गेल्यानं राज्यात ३ जणांचा मृत्यू झाला. त्यात अहिल्यानगरमध्ये २ आणि नांदेडमधल्या एका व्यक्तीचा समावेश आहे.    राज्यात सध्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे १८ आणि राज्य...

September 29, 2025 3:18 PM

views 53

अतिवृष्टीसारख्या परिस्थितीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीपैकी १० % निधी

जिल्हा नियोजन समितीच्या निधीपैकी १० टक्के निधी अतिवृष्टी, गारपीट किंवा पाणी टंचाई यासारख्या परिस्थितीसाठी वापरण्याची मुभा राज्य सरकारनं दिली आहे. यासंदर्भातला शासन आदेश नियोजन विभागानं आज जारी केला. हा निधी खर्च करण्यासाठी मंजुरी देण्याचे अधिकार पालकमंत्र्यांना असतील आणि त्यानंतर होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत त्याला मान्यता घ्यावी लागेल.  

September 26, 2025 7:41 PM

views 49

केंद्रसरकार अतिवृष्टीग्रस्तांच्या पाठीशी असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मुख्यमंत्र्यांना आश्वासन

महाराष्ट्रातल्या आपद्ग्रस्त शेतकर्‍यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहू, असं आश्वासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची आज नवी दिल्ली इथं भेट घेतली. राज्यातल्या अतिवृष्टी, पूरस्थिती आणि त्यातून शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानीची माहिती त्यांनी यावेळी प्रधानमंत्र्यांना दिली. त्यावेळी  प्रधानमंत्र्यांनी हे आश्वासन दिल्याचं फडणवीस यांनी माध्यमांना सागितलं. याशिवाय, महाराष्ट्रातले संरक्षण कॉरिडॉर, गडचिरोलीतील पोलाद उत्पादनासाठी सवलत...

September 26, 2025 7:00 PM

views 76

अतिवृष्टीग्रस्तांना सरकारकडून मदत पोहोचवली जात असल्याची उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती

राज्यात अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना सरकारकडून मदत पोहोचवली जात असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. पुण्यात आज ते वार्ताहरांशी बोलत होते. राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून भरीव मदत देण्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना निवेदन दिल्याचंही पवार यावेळी म्हणाले. पुराच्या पाण्यामुळे नुकसान झालेल्यांना ५ हजार रुपये आर्थिक मदत आणि १० किलो धान्य दिलं जाणार आहे. गरजेनुसार, धान्याची मदत वाढवण्याचेही प्रयत्न सुरू असल्याची माहिती पवार यांनी वार्ताहरांना दिली.

September 25, 2025 3:13 PM

views 50

पूरग्रस्तांसाठी केंद्रसरकारकडून विशेष पॅकेज मिळवून देण्याचं आठवले यांचं आश्वासन

राज्यातल्या पूरग्रस्तांसाठी केंद्र सरकारकडून विशेष पॅकेज मिळवून देण्याचं आश्वासन आज केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी दिलं. धाराशिव जिल्ह्यात पूरग्रस्त भागाची पाहणी करताना ते बोलत होते. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करु, आपद्ग्रस्तांना आणखी मदत मिळणं  गरजेचं असून त्याकरता केंद्रसरकारकडून राज्याला विशेष मदतीचं पॅकेज मिळवून देण्याचा प्रयत्न करु असं आश्वासन त्यांनी दिलं. संबंधित क्षेत्रातल्या शेतकऱ्यांची कर्जं  माफ करावी असं आपण बँकाना  सांगणार असून, खासगी कंपन्...

September 25, 2025 3:06 PM

views 75

मराठा समाजासाठी विविध योजना सुरू केल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

नोकऱ्या मोठ्या प्रमाणात नसल्यामुळे मराठा समाजाला केवळ आरक्षण देऊन प्रश्न सुटणार नाहीत, त्यामुळे मराठा समाजासाठी विविध योजना सुरू केल्या, असं मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त आज नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात माथाडी कामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहं उभारण्यात आली आहेत, सारथी संस्थेमार्फत स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतली जात आहे...

September 24, 2025 3:04 PM

views 57

राज्यातल्या अनेक जलाशयांमधून पाण्याचा विसर्ग

मुसळधार पावसामुळे नद्यांचे प्रवाह वाढले असून राज्यातल्या अनेक जलाशयांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. पैठणच्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ९८ टक्क्यांवर गेला आहे. धरणात सध्या ६६ हजार ७६९ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरु असून, विसर्ग कमी करण्यात आला आहे. सध्या धरणातून १८ हजार ८६४ दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.    नांदेडमध्ये विष्णुपुरी प्रकल्पाचे १६ दरवाजे उघडण्यात आले आहेत. प्रकल्पातून अडीच लाख क्युसेक्स विसर्ग गोदावरी पात्रात केला जात आह...