March 18, 2025 3:19 PM

views 44

मल्टिस्टेट पतसंस्थांना संरक्षण देण्याची मागणी केंद्राकडे करणार – मुख्यमंत्री

राज्यातील छोट्या गुंतवणूकदारांचे पाच लाखांपर्यंतचे पैसे सुरक्षित रहावे यासाठी फसवणूक करणाऱ्या मल्टिस्टेट पतसंस्थांना देखील सहकारी बँकांप्रमाणे संरक्षण द्यावे अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तराच्या तासांत दिली.   बीड जिल्ह्यात ज्ञानराधा मल्टिस्टेट पतसंस्थेकडून फसवणूक झालेल्या सहा लाख ठेवीदारांचे पैसे जप्त करण्यात आलेल्या ८० मालमत्तांचा लिलाव करून परत केले जातील. यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण कायदा तयार केला आहे,...

December 5, 2024 8:11 PM

views 49

७ ते ९ डिसेंबर या कालावधीत विधानसभेचं विशेष अधिवेशन

राज्याला स्थिर आणि लोकाभिमुख सरकार देऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थोड्या वेळापूर्वी वार्ताहर परिषदेत दिली. ७ ते ९ डिसेंबर या कालावधीत विशेष अधिवेशन घेऊन विधानसभा अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण करून राज्यपालांचं अभिभाषण व्हावं, यासाठीची शिफारस राज्यपालांना केली असल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली.   महायुतीच्या जाहीरनाम्यात दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण करायच्या आश्वासनाचा पुनरुच्चार त्यांनी केला. नव्या विधिमंडळात विरोधकांची संख्या कमी असली, तरी त्यावरून त्यांचं मूल्यम...

December 1, 2024 10:27 AM

views 51

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भारतीय जैन संघटनेच्या राष्ट्रीय अधिवेशनाचं उद्घाटन

भारतीय जैन संघटनेच्या राष्ट्रीय अधिवेशनाचं उद्घाटन काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुण्यातील बिबवेवाड़ी इथं झालं. भगवान महावीर आणि जैन धर्मातील अन्य तीर्थंकरानी सांगितल्याप्रमाणे आपण घेण्यापेक्षा देण्यावर जास्त भर द्यायला हवा असं प्रतिपादन त्यांनी केलं. जैन समाजातील व्यक्ति कमाईपेक्षा जास्त समाजाला देण्यावर विश्वास ठेवतात. समाजातल्या प्रत्येक व्यक्तीची उन्नती करण्याचं ध्येय समोर ठेवून येणाऱ्या पिढ्यांना घडवण्याचं काम भारतीय जैन संघटना करत आहे त्यामुळे हा केवळ एका समाजाचा कार्यक्र...

November 13, 2024 3:09 PM

views 44

भाजप खऱ्या अर्थानं संविधानाचं रक्षण करत आहे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातलं भाजपाचं सरकार खऱ्या अर्थानं संविधानाचं रक्षण करत आहे, असं प्रतिपादन भाजपाचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते आज नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड इथं आयोजित प्रचार सभेत बोलत होते. महाविकास आघाडीनं भाजपामुळे आरक्षण जाणार, संविधान बदलणार अशी खोटी कथानकं रचून मतं मिळवण्याचा प्रयत्न केला, अशी टीका त्यांनी केली. मात्र काँग्रेसचा दुटप्पीपणा जनतेच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

November 12, 2024 6:37 PM

views 47

महायुतीचं सरकार कुणालाही उद्ध्वस्त करुन विकास करणार नाही – देवेंद्र फडणवीस

महायुतीचं सरकार कुणालाही उद्ध्वस्त करुन विकास करणार नाही. सर्वांना सोबत घेऊन जाणारं सरकार असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. पालघर जिल्ह्यात डहाणूत ते प्रचारसभेत बोलत होते. वाढवण बंदरासारख्या मोठ्या प्रकल्पांच्या विरोधात खोटा प्रचार करून विकासात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला. जल, जमीन आणि जंगलाचे रक्षण करण्याचं आश्वासन त्यांनी आदिवासींना दिलं. पालघरमध्ये विमानतळाची मागणी प्रधानमंत्री नरेेंद्र मोदी यांनी मंजूर केली आहे. वाढवण बंदर, को...

November 9, 2024 4:41 PM

views 53

सरकार आल्यावर चंद्रपूर इथल्या दीक्षाभूमीसाठी शंभर कोटी रुपये देऊ – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महायुती सरकारनं राज्यात अनेक समाजोपयोगी योजना आणल्या असं सांगत सरकार आल्यावर चंद्रपूर इथल्या दीक्षाभूमीसाठी शंभर कोटी रुपये देऊ, असं आश्वासन भाजपा नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. चंद्रपूर इथं प्रचारसभेत ते बोलत होते. महिला आणि शेतकऱ्यांसाठीच्या योजनांचाही त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला.  

October 15, 2024 7:57 PM

views 36

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण मिळू दिलं नाही, जरांगेंचा आरोप

आचारसंहिता लागायच्या आधी मराठ्यांना आरक्षण मिळेल अशी आशा होती, पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आरक्षण मिळू दिलं नाही, असा आरोप मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी केला आहे. त्यांनी आज जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं वार्ताहरांशी संवाद साधला. आता विधानसभा निवडणुकीत कुणाच्या जागा वाढवायच्या आणि कुणाच्या कमी करायच्या हे आम्ही ठरवू, असा इशारा जरांगे यांनी यावेळी दिला.    आमची निवडणुकीसाठीही संपूर्ण तयारी आहे. याबाबत लवकरच समाजाची बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, अस त्यांनी सांगि...

October 13, 2024 3:45 PM

views 53

गोंदियातल्या तिरोडा-गोरेगाव मतदार संघातली ७५ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार – उपमुख्यमंत्री फडणवीस

गोंदिया जिल्ह्यातल्या तिरोडा-गोरेगाव मतदार संघातली ७५ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असल्यानं हा मतदारसंघ सुजलाम्-सुफलाम् होणार आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्रातल्या धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक दोन अंतर्गत ५ हजार २१७ कोटी रुपयांच्या विकासकामांचं तसंच, तिरोडा नगर परिषद आणि गोरेगाव नगर पंचायत क्षेत्रातल्या २०५ कोटी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन आज फडणवीस यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला खासदार...

September 25, 2024 2:54 PM

views 44

माथाडींसाठीचा कायदा आणखी मजबूत करण्यात येईल, उपमुख्यमंत्री फडणवीस यांचं आश्वासन

माथाडी कामगारांचा मोबदला स्वतःच्या खिशात टाकणाऱ्यांवर सरकारने कारवाई केली असून यापुढेही अशी कारवाई करण्यात येईल, माथाडींसाठीचा कायदा आणखी मजबूत करण्यात येईल, असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. माथाडी कामगारांचे नेते अण्णासाहेब पाटील यांची जयंती आणि गुणवंत कामगार पुरस्काराचा वितरण समारंभ नवी मुंबईत झाला, त्यावेळी फडणवीस बोलत होते. माथाडी कामगारांना घर मिळण्यासाठी पुढाकार घेऊ, महामंडळाचा नामविस्तार मराठा क्रांतीसूर्य अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ  असा करू असं आश्वासन...

September 16, 2024 2:45 PM

views 59

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी धार्मिक तेढ निर्माण केल्याचा काँग्रेसचा आरोप

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकातल्या गणपती विसर्जनाबाबत खोटी बातमी पसरवून राज्यात धार्मिक तेढ निर्माण केल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसनं केला आहे. याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी करत, प्रदेश काँग्रेसच्या विधि विभागाचे अध्यक्ष ॲड. रविप्रकाश जाधव यांनी कुलाबा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे.    भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी या संदर्भात खोटी माहिती प्रसारित करून समाजात तेढ आणि धार्मिक तणाव निर्माण करण्याचा, तसंच सामाजिक...