January 3, 2025 1:43 PM

views 49

बॉर्डर- गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या अखेरच्या सामन्यात भारताचा पहिला डाव १८५ धावांमधे आटोपला

बॉर्डर गावस्कर चषक भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया क्रिकेट कसोटी मालिकेत सिडनी इथं सुरू असलेल्या अखेरच्या सामन्यात भारताचा पहिल्या डाव १८५ धावांवर आटोपला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऋषभ पंत ने सर्वाधिक ४० धावा केल्या तर रवींद्र जाडेजा ने २६ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या बोलांड ने ३१ धावात ४ गडी बाद केले. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव सुरु झाला असून दिवसअखेर १ बाद ९ धावा झाल्या आहेत.  

December 29, 2024 3:59 PM

views 44

मेलबर्न कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाच्या आपल्या दुसऱ्या डावात, ९ बाद २२८ धावा

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या मेलबर्न इथं सुरू असलेल्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात, चौथ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियानं आपल्या दुसऱ्या डावात, ९ बाद २२८ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात भारतावर १०५ धावांची आघाडी मिळवली होती, त्यामुळे त्यांची एकूण आघाडी ३३३ धावांची झाली आहे. शतकवीर नितेश रेड्डी ११४ धावांवर नॅथन लायनच्या गोलंदाजीवर झेलबाद झाल्यानं भारताचा पहिला डाव ३६९ धावांत आटोपला. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाचे फल...

December 18, 2024 1:50 PM

views 50

बॉर्डर-गावस्कर चषक : भारत – ऑस्ट्रेलियात यांच्यातला तिसरा सामना अनिर्णित

भारत आणि ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बॉर्डर - गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेतला ब्रिस्बेन इथं झालेला तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिला.   आज सामन्याच्या अखेरच्या दिवशी भारताचा पहिला डाव कालच्या धावसंख्येत ८ धावांची भर घालून २६० धावांवर आटोपला. त्यानंतर ऑस्ट्रेलियानं दुसऱ्या डावात वेगानं धावा करत ७ बाद ८९ धावा झाल्या असताना डाव घोषित केला, आणि पहिल्या डावातल्या १८५ धावांच्या आघाडीसह भारतासमोर विजयासाठी २७५ धावांचं आव्हान ठेवलं.   मात्र भारताच्या दुसऱ्या डावात केवळ २ षटकं आणि १ चेंडूचा ...

December 16, 2024 3:35 PM

views 49

बॉर्डर गावस्कर चषक स्पर्धेतल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताची पहिल्या डावात खराब सुरुवात

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ऑस्ट्रेलियात गॅबा इथं सुरु असलेल्या बॉर्डर-गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात आज तिसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा भारत ३९४ धावांनी पिछाडीवर होता. ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात केलेल्या ४४५ धावांना उत्तर देताना भारतानं चार गडी गमावत ५१ धावा केल्या आहेत. रोहित शर्मा आणि के एल राहुल खेळत असून पावसामुळे खेळाचा काही वेळ वाया गेला. 

December 12, 2024 8:35 AM

views 66

महिलांच्या पन्नास षटकांच्या क्रिकेट मालिकेत ऑस्ट्रेलियाचा भारतावर विजय

महिला क्रिकेटमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात काल पर्थ इथे झालेल्या पन्नास षटकांच्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा 83 धावांनी पराभव करत ही संपूर्ण मालिका जिंकली. 299 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा डाव 45 षटक आणि एका चेंडूत 215 धावांतच आटोपला. भारताकडून स्मृती मंधानाने सर्वाधिक 105 धावा केल्या. अरुंधती रेड्डीनं 4 बळी घेतले. तत्पूर्वी, ॲनाबेल सदरलँडच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं 6 गडी गमावून 298 धावा केल्या. ॲनाबेलनं 95 चेंडूत 110 धावा केल्या.  

November 25, 2024 7:09 PM

views 66

भारताची बॉर्डर गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेत विजयी सलामी

बॉर्डर- गावस्कर करंडक कसोटी मालिकेतल्या पहिल्या क्रिकेट सामन्यात आज भारताने ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत १- शून्यने आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियात पर्थ इथं झालेल्या सामन्यात भारतानं यजमान संघाला २९५ धावांनी धूळ चारली. हा विजय भारताचा सगळ्यात मोठ्या कसोटी विजयांपैकी एक ठरला.   भारताचा कर्णधार जसप्रित बुमरा आणि मोहम्मद सिराज  यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव केवळ २३८ धावांमधे गुंडाळला गेला. तत्पूर्वी विराट कोहलीची नाब...

November 25, 2024 1:46 PM

views 67

भारताचा ऑस्ट्रेलियावर २९५ धावांनी दणदणीत विजय

बॉर्डर गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर २९५ धावांनी विजय मिळवला आहे. ५३४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सर्व गड्यांच्या मोबदल्यात ऑस्ट्रेलियाच्या २३८ धावा झाल्या. भारताकडून जसप्रित बुमराह,मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. तर वॉशिग्टन सुंदर यानं दोन गडी बाद केले.   काल विराट कोहली आणि यशस्वी जैस्वालच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने दुसऱ्या डावात ६ बाद ४८७ धावा केल्या. त्यानंतर भारतानं डाव घोषित केला. ऑस्ट्रेलियाचा संघ फलंदाजीसाठी...

November 22, 2024 8:03 PM

views 44

बॉर्डर-गावसकर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचा पहिला डाव १५० धावांवर समाप्त

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरु झालेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना रंगतदार अवस्थेत पोचला आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाचा संघ ७ बाद ६७ असा अडचणीत सापडला आहे. तत्पूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या भारतीय संघाचा पहिला डावही अवघ्या १५० धावांत गडगडला. मात्र भारतीय संघ अद्यापही ८३ धावांनी आघाडीवर आहे. भारतीय संघाच्या डावाला आकार देण्यात नवोदित नितीश कुमार रेड्डीनं मोलाची भूमिका बजावली. ४१ धावांचं योगदान देणाऱ्या नितीश क...

November 21, 2024 3:50 PM

views 53

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या बॉर्डर-गावस्कर चषकाला उद्यापासून सुरुवात

क्रिकेटमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या बॉर्डर-गावस्कर चषकाला उद्यापासून ऑस्ट्रेलियातल्या पर्थ इथं सुरुवात होत आहे. दोन्ही संघांमध्ये २२ नोव्हेंबर ते ७ जानेवारी दरम्यान पाच कसोटी सामने खेळले जातील. भारतीय कर्णधार रोहित शर्मा वैयक्तिक कारणामुळे पहिला सामना खेळू शकत नसल्यामुळे जसप्रीत बुमराह हा नेतृत्व करणार आहे. भारतीय गोलंदाजी प्रशिक्षण मोर्ने मार्केल यांनी जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वगुणाची वार्ताहर परिषदेत प्रशंसा केली. उद्याचा पहिला सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी सात वाजून ५० मिनिटां...

November 4, 2024 1:52 PM

views 55

ऑस्ट्रेलियात भारताच्या पहिल्या महावाणिज्य दुतावासाचं उद्घाटन

ऑस्ट्रेलियात ब्रिसबेन इथं भारताच्या पहिल्या महावाणिज्य दुतावासाचं परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी आज उद्घाटन केलं. भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यात दीर्घकाळापासून घनिष्ठ संबंध असून, व्यापार तसंच शैक्षणिक संबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी योगदान देणार असल्याचं एस जयशंकर यांनी यावेळी बोलताना सांगितलं. बैठकीदरम्यान, दोन्ही नेत्यांनी भारत आणि क्वीन्सलँडमधील आर्थिक, व्यापार आणि गुंतवणूक सहकार्य मजबूत करण्याच्या संधी आणि मार्गांवर चर्चा केली.