रस्त्यांवर गुराढोरांमुळे होणाऱ्या अपघातांप्रकरणी पीडितांना नुकसानभरपाई देण्यासाठी स्पष्ट नियमावली तयार करावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज केंद्र आणि राज्य सरकारांना दिले आहेत. ही जनावरं आपापल्या आसऱ्यात सुरक्षितपणे परत आणण्याची जबाबदारी त्यांच्या मालकांची आहे, असं न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती कोटीश्वर सिंग यांच्या पीठानं स्पंष्ट केलं. सर्व जनावरांना पट्टा घालणं, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं, लस देणं, या बाबी अनिवार्य केल्या पाहीजेत, असं न्यायालयाने सुचवलं आहे. सध्या या बाबतीत सर्व राज्यांमधे वेगवेगळे नियम लागू होतात.
गुराढोरांमुळे होणाऱ्या अपघातांप्रकरणी पीडितांना नुकसानभरपाई देण्यासाठी स्पष्ट नियमावली तयार करण्याचे आदेश-SC