August 5, 2026 8:13 PM

printer

तरुण विद्यार्थी आंदोलकांसमोर जाताना सरकारी यंत्रणांनी संयम बाळगला पाहिजे-SC

तरुण विद्यार्थी आंदोलकांसमोर जाताना सरकारी यंत्रणांनी संयम बाळगला पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. जंतरमंतरवर विद्यार्थी आंदोलनात झालेल्या पोलीस कारवाईसंदर्भात दाखल झालेल्या याचिकेची सुनावणी करताना सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आज सांगितलं की, अशावेळी सरकारी यंत्रणांनी बळाचा वापर केला तर परिस्थिती चिघळू शकते, त्याऐवजी आंदोलकांचं म्हणणं समजून घेणं आवश्यक असतं असं मत त्यांनी नोंदवलं. या आंदोलनाला हाताळणाऱ्या सरकारी यंत्रणांवर आपला विश्वास असल्याचंही यावेळी  सरन्यायाधीशांनी म्हटलं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.