प्रादेशिक बातम्या

November 8, 2025 3:16 PM

views 89

गडचिरोलीला महाराष्ट्राचं प्रवेशद्वार म्हणून होण्यासाठी राज्यसरकार प्रयत्नशील

गडचिरोलीचा उल्लेख महाराष्ट्राचं प्रवेशद्वार म्हणून होण्यासाठी शेवटच्या गावापर्यंत विकास पोहोचवण्याकरता राज्यसरकार प्रयत्नशील आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा इथं रुबी हॉस्पीटल अँड वेलनेस रुग्णालय आणि महाविद्यालय संकुलाचं उद...

November 8, 2025 3:12 PM

views 64

नशेचं इंजेक्शन विकणाऱ्या तरुणाला अलिबाग पोलीसांनी केली अटक

नशेचं इंजेक्शन विकणाऱ्या एका तरुणाला अलिबाग पोलिसांनी सापळा रचून अटक केली. यावेळी त्याच्याकडून इंजेक्शनच्या दहा बाटल्या आणि काही रोकड रक्कम जप्त केली.   पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आक्षी साखर इथल्या कोळीवाडा परिसरात सूरज मनोज राणे हा तरुण मेफेन्टर माईन सल्फेट हे गुंगीकारक इंजेक्शन बेकायदेशीर...

November 8, 2025 3:10 PM

views 69

पुणे जमीन घोटाळ्यात कोणत्याही दोषीला सोडलं जाणार नाही, अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही

पुणे जमीन घोटाळ्यात कोणत्याही दोषीला सोडलं जाणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. नागपूर इथे आज वार्ताहरांशी ते बोलत होते. या प्रकरणात अनियमितता झाल्याचंही स्पष्ट झालं असून अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. प्रकरणाची व्याप्ती आणि संप...

November 8, 2025 11:40 AM

views 75

दुष्काळी भागात मनरेगाचा ६५ टक्के निधी पाणी पुरवठा योजनांसाठी-केंद्रीय कृषी मंत्री

दुष्काळी भागात मनरेगाचा ६५ टक्के निधी पाणी पुरवठा योजनांसाठी खर्च केला जाईल, अशी घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली आहे. ते काल बीड जिल्ह्यात शिरसाळा इथं शेतकरी संवाद मेळाव्यात बोलत होते. शेतकऱ्यांचं उत्पन्न एवढं वाढवायचं आहे की, एकाही शेतकऱ्याला आत्महत्‍या करावी लागू नये, हे आपल...

November 7, 2025 8:55 PM

views 177

वंदे मातरम् या गीताच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवाचं प्रधानमंत्र्याच्या हस्ते उद्घाटन

देशप्रेमाचं प्रतीक असलेल्या वंदे मातरम् गीताच्या ‘शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी’ वर्षांचं उद्घाटन आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या निमित्ताने, देशभरात वर्षभर विविध कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमात पंतप्...

November 7, 2025 8:53 PM

views 74

VVPAT वापर न करायच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर निवडणूक आयोगाला नोटिस

महाराष्ट्रात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर न करण्याच्या राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर पीठानं आज राज्य निवडणूक आयोगाला नोटिस बजावली आणि पुढच्या आठवड्यापर्यंत आपलं म्हणणं मांडायचे निर्देश दिले. काँग्रेसचे रा...

November 7, 2025 8:56 PM

views 161

महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या महाराष्ट्रातल्या खेळाडूंचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

ICC महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ चं विजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघातल्या स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रिग्ज आणि राधा यादव, या महाराष्ट्रातल्या तीन खेळाडूंचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या वर्षा निवासस्थानी सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी या तिघींना शाल, पुष्पगुच्छ, तसंच प्रत्येकी सव्वा दोन...

November 7, 2025 2:55 PM

views 114

ज्येष्ठ अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

ज्येष्ठ अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचं काल दीर्घ आजारानं निधन झालं. त्या ७१ वर्षांच्या होत्या. सुलक्षणा पंडित यांनी पार्श्वगायनातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती.   त्यांनी आतापर्यंत हिंदी, मराठी, बंगाली, उडिया आणि गुजराती भाषांमध्ये गाणी...

November 7, 2025 2:28 PM

views 94

स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणाऱ्या वंदे मातरम् या गीताच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणाऱ्या वंदे मातरम् या गीताच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवाची आज सुरुवात झाली. हे गीत बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी दीडशे वर्षांपूर्वी लिहिलं होतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथं ‘वंदे मातरम्‌’ शतकोत्तर सुवर्णमहोत्सवाचं उद्घाटन केलं. ‘वंदे मातरम्‌’ हा एक मंत्र ...

November 7, 2025 2:24 PM

views 51

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचा वंदे मातरम् गीताला अभिवादन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रीय गीत वंदे मातरमच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवानिमित्त अभिवादन केलं आहे. स्वातंत्र्यसमराच्या काळात ब्रिटिशांच्या विरोधात सन्यांशांनी पुकारलेल्या बंडाच्या वेळी बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी या अमर गीताची रचना केली होती, असं राष्ट्रपतींनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटल...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.