January 23, 2025 8:10 PM

views 66

राज्यातल्या सहा ‘जल योद्ध्यांना’ प्रजासत्ताक दिन सोहळ्याचं निमंत्रण

अटल भूजल योजनेअंतर्गत भूजल व्यवस्थापनामध्ये राज्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहा ‘जल योद्ध्यांना’ प्रजासत्ताक दिन सोहळ्यात विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आलं आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे सहसंचालक डॉ. प्रवीण कथने यांनी वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. त्यात पुणे जिल्ह्यातल्या काऱ्हाटी ...

January 23, 2025 9:21 PM

views 58

‘अनुजा’ लघुपटाला ९७व्या ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन

ऑस्कर पुरस्कार विजेत्या गुनीत मोंगा आणि प्रियांका चोप्रा यांच्यासह इतरांची निर्मिती असलेल्या ‘अनुजा’ या लघुपटानं ९७व्या ऑस्कर पुरस्कारांसाठी सर्वोत्कृष्ट लाइव्ह ॲक्शन लघुपट या विभागात नामांकन मिळवलं आहे. ऑस्करसाठीच्या अंतिम नामांकनांची घोषणा आज झाली. ‘अनुजा’ या लघुपटाचं लेखन आणि दिग्दर्शन ॲडम ग्रेव्...

January 23, 2025 7:38 PM

views 79

ज्येष्ठ कवी, लेखक अनिल सोनार यांचं निधन

ज्येष्ठ कवी, लेखक अनिल सोनार यांचं आज धुळे इथं निधन झालं. ते ७९ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर शहरातल्या स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात आले. सोनार यांची २१ नाटकं, तीन कादंबऱ्या, सहा काव्य संग्रह, ३८ एकांकिका, एक आस्वादक समीक्षापर लेख संग्रह, एक विनोदी लेख संग्रह, पाच बालकथा संग्रह, दोन एकांकि...

January 23, 2025 8:10 PM

views 58

एसटीची सर्व बसस्थानकं सुंदर करण्याचा प्रयत्न – मंत्री प्रताप सरनाईक

एसटी बसस्थानकांची स्वच्छता ही कर्मचारी आणि प्रवाशांची संयुक्त जबाबदारी असून, या अभियानाच्या माध्यमातून एसटीची सर्व बसस्थानकं सुंदर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आज म्हणाले. मुंबईत कुर्ला नेहरूनगर बसस्थानकावर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियाना...

January 23, 2025 8:10 PM

views 28

जनगणनेनंतर नवीन जिल्हे तयार करण्याचा निर्णय – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नवीन जिल्हे तयार करण्याचा कुठलाही प्रस्ताव राज्य सरकारकडे आलेला नाही. जनगणनेनंतर यासंदर्भातला निर्णय होऊ शकतो, असं स्पष्टीकरण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिलं. ते नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते. अनेक ठिकाणी नवीन अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय तयार केलं जाईल, असं ते म्हणाले.  प्रत्येक आदिव...

January 23, 2025 7:23 PM

views 48

गुईलेन बॅरे सिंड्रोम आजार संसर्गजन्य नसून नागरिकांनी घाबरू नये – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे शहरात सध्या गुईलेन-बॅरे सिंड्रोम या आजारानं डोकं वर काढलं आहे, मात्र हा संसर्गजन्य आजार नाही, त्यामुळं नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असं आवाहन उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आज केलं. याबाबतच्या  आढावा बैठकीनंतर ते बोलत होते. गुईलेन-बॅरे सिंड्रोम आजाराची लागण झालेल्यांची संख्या आता...

January 23, 2025 8:10 PM

views 62

भारतीय कृषि व्यवस्था जागतिकीकरणाकडे जात असल्याचं राज्यपालांचं प्रतिपादन

भारतीय कृषि व्यवस्था हळूहळू उच्च दर्जाच्या कृषि उत्पादनातून जागतिकीकरणाकडे जात असल्याचं प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं आहे. ते आज परभणीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापिठाच्या २६ व्या दीक्षांत समारंभात बोलत होते. स्वातंत्र्यानंतर अन्नधान्य आयात करणाऱ्या देशाची भूक भागवून सध्या द...

January 23, 2025 7:08 PM

views 56

मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर अंबादास दानवेंचा सवाल

दावोसमध्ये झालेल्या सामंजस्य करारातल्या २९ पैकी २८ कंपन्या भारतातल्या आहेत. २८ पैकी २० राज्यातल्या असताना दावोस दौरा कशासाठी असा सवाल विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. २० पैकी १५ मुंबईतल्या, ४ पुण्यातल्या, एक ठाण्यातली आहे, असंही ते म्हणाले. त्याचवेळी गेल्यावर्षी झालेल्या...

January 23, 2025 6:46 PM

views 40

ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते मोहन हिराबाई हिरालाल यांचं निधन

पर्यावरण आणि वनहक्क चळवळीतले ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते मोहन हिराबाई हिरालाल यांचं काल मध्यरात्रीच्या सुमारास नागपूरमधे निधन झालं. ते ७५ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. गडचिरोली लेखा मेंढा गावाला देशपातळीवर ओळख निर्माण करुन देणारे मोहन हिराबाई हिरालाल यांच्यावर महात्मा गांधी ...

January 23, 2025 8:08 PM

views 27

रणजीमध्ये मुंबई, महाराष्ट्र आणि विदर्भाच्या संघाचे सामने सुरू

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत नाशिक इथं सुरु झालेल्या बडोद्याविरुद्धच्या सामन्यात महाराष्ट्रानं पहिल्या डावात दिवसअखेर ७ गडी गमावून २५८ धावा केल्या. आजचा खेळ थांबला तेव्हा सौरभ नवले ६०, तर रजनीश गुरबानी २२ धावांवर खेळत होता. सिद्धेश वीरनं ४८, तर यश क्षीरसागरनं ३० धावा केल्या. बडोद्यातर्फे अतित शेठनं ३...