December 14, 2024 10:13 AM

views 51

भविष्यात मुंबई फिनटेकची राजधानी होईल-वर्ल्ड हिन्दू इकॉनॉमिक परिषदेत मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

भविष्यात मुंबई फिन-टेकची राजधानी होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. काल मुंबईत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमधे वर्ल्ड हिन्दू इकॉनॉमिक परिषदेचं उद्घाटन करतांना ते बोलत होते. २०२८ ते २०३० पर्यंत ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट राज्य सरकार पूर्ण करेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राला भारताचे पॉवर हाऊस म्हणून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले.‘‘हमारे देश में केवल आर्थिक और सामाजिक ने तो सांस्कृतिक पुन...