January 18, 2026 2:40 PM

views 30

भारतीय हवामान विभागाची पुढील दोन दिवस दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाब आणि बिहारमधील काही ठिकाणी दाट धुक्याची शक्यता

भारतीय हवामान विभागानं पुढील दोन दिवस दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाब आणि बिहारमधील काही ठिकाणी दाट धुक्याची शक्यता वर्तवली आहे. जम्मू आणि काश्मीर, लडाख, उत्तराखंड, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्येही आज अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे, तर मध्य प्रदेशचा काही भाग, छत्तीसगड आणि ओडिशामध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. पुढील दोन दिवसांत वायव्य आणि मध्य भारतात किमान तापमानात सुमारे २ अंश सेल्सिअसनं वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

December 21, 2025 2:35 PM

views 68

देशाच्या उत्तर भागात धुक्याची दाट चादर

जम्मू-काश्मीर, लडाख, मुझफ्फराबाद आणि गिलगिट बाल्टिस्तानमध्ये आज जोरदार हिमवर्षाव होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र, उत्तर आणि दक्षिण कर्नाटक आणि तेलंगणामध्ये आज थंडीची लाट राहील असा अंदाज आहे.  दिल्ली, हरियाणा, बिहार, छत्तीसगड आणि चंदीगडच्या काही भागात आज दाट धुक्याचा थर राहील, तर मध्य प्रदेश, ओदिशा, पश्चिम उत्तर प्रदेश, झारखंड आणि ईशान्य भारतातही अशीच स्थिती राहील असा अंदाज आहे.  दरम्यान, राजधानी दिल्ली परिसरात हवेची गुणवत्ता अदयाप खराब श्रेणीत असल्याचं केंद्रीय प्रदूषण नियंत्...

December 1, 2025 1:42 PM

views 63

‘या’ भागात थंडीची लाट येणार…

येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पंजाबमधे थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर आंध्रप्रदेश, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल आणि तेलंगणामधे जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कर्नाटकमधे विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचे वारे येईल, असं हवामान विभागाने कळवलं आहे. तर मणिपूर आणि ओदिशामधे दाट धुकं पसरण्याची शक्यता आहे. 

October 16, 2025 8:13 PM

views 70

महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांमधल्या हवामानात बदल

महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांमधल्या हवामानात  बदल झाल्याचं दिसून येत असल्याचं युनिसेफ इंडियाचे हवामान तज्ज्ञ युसूफ कबीर यांनी आज सांगितलं. पत्र सूचना कार्यालय, मुंबई आणि युनिसेफ, इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने हवामान बदल आणि पर्यावरणीय शाश्वता या विषयावर मुंबईत आयोजित परिसंवादात ते बोलत होते.    सातारा जिल्ह्याच्या काही भागात कमी पाऊस पडायचा, आता तिथं  मुसळधार पाऊस होत असल्याकडे, कबीर यांनी लक्ष वेधलं. हवामानातल्या या बदलांचा अभ्यास केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था...

October 13, 2025 7:18 PM

views 118

नैऋत्य मौसमी पावसाची राज्यातून पूर्णपणे माघार

नैऋत्य मौसमी पावसानं राज्यातून पूर्णपणे माघार घेतली असल्याचं हवामान विभागानं जाहीर केलंय. राज्यातला मान्सूनचा माघारीचा प्रवास आज पूर्ण झाला. आता केवळ दक्षिण भारत आणि ओडिशातून मान्सूनची माघार शिल्लक आहे.    येत्या दोन दिवसात राज्याच्या चारही विभागांमधे तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात तुरळक ठिकाणी ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. 

August 3, 2025 8:06 PM

views 32

खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा वेळे आधीच स्थगित

वार्षिक अमरनाथ यात्रा प्रतिकूल हवामान आणि खराब रस्ते या कारणांमुळे आजपासून स्थगित करण्यात आली आहे. ही यात्रा ९ ऑगस्ट रोजी समाप्त होणार होती. तीन दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे यात्रा तात्पुरती थांबवण्यात आली होती.   मात्र बालताल आणि पहलगाम या दोन्ही मार्ग यात्रेसाठी सुरक्षित नसून या मार्गांवरून यात्रा पुन्हा सुरू होणार नसल्याची घोषणा काल अधिकाऱ्यांनी केली. यावर्षी सुमारे चार लाख यात्रेकरूंनी अमरनाथ गुहेचं दर्शन घेतलं आहे.

April 25, 2025 10:26 AM

views 64

देशाच्या वायव्य भागात उष्णतेची लाट; तर इशान्येकडे मुसळधार पावसाची शक्यता

हवामान - आगामी  तीन ते चार दिवस वायव्य भारतात उष्णतेच्या लाटेची परिस्थिती राहील अशी शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. छत्तीसगड, पश्चिम बंगाल, सिक्कीम, बिहार, ओडिशा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि तेलंगण इथे उद्यापर्यंत उष्णतेच्या लाटेची परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.   तर रविवारपर्यंत पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम आणि मेघालयात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अरुणाचल प्रदेश आणि नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा इथेही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

April 10, 2025 10:52 AM

views 38

हवामान बदल हे सध्याचं सर्वात मोठं संकट- प्रधानमंत्री

हवामान बदल हे सध्याचं सर्वात मोठं संकट असून शाश्वत जीवनशैली हा त्यावरचा उपाय आहे. जैन समाज कित्येक शतकांपासून त्याचा अवलंब करत आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नवकार महामंत्र दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते.   नवकार महामंत्र विकसित भारताच्या संकल्पनेशी निगडीत आहे असं सांगून पाणी बचत, वृक्षारोपण, स्वच्छता, स्वदेशी, देशांतर्गत पर्यटन, सेंद्रिय शेती, आरोग्यपूर्ण जीवनशैली, योग, खेळ आणि गरीबांची मदत- असे नवसंकल्प करण्याचं आवाहन पंतप्रधान मोद...

March 20, 2025 2:32 PM

views 45

२०२४ हे आतापर्यंतचं सर्वात उष्ण वर्ष राहिल्याचा संयुक्त राष्ट्रांच्या हवामानविषयक संस्थेचा अहवाल

२०२४ हे आतापर्यंतचं सर्वात उष्ण वर्ष राहिल्याचं संयुक्त राष्ट्रांच्या हवामान शास्त्र संघटनेच्या वार्षिक अहवालात म्हटलं आहे. या वर्षात जागतिक तापमान १८५० ते १९०० या वर्षांमध्ये निर्धारित करण्यात आलेल्या आधार रेषेपेक्षा प्रथमच दीड अंश सेल्सिअसने  अधिक नोंदवलं गेल्याचं यात म्हटलं आहे. २०२४ या वर्षात जगभरात नैसर्गिक आपत्तीमुळे सर्वात जास्त लोक विस्थापित झाले असून, सौदी अरेबियासह अनेक ठिकाणी उष्णतेची अभूतपूर्व लाट उसळल्याचं अहवालात म्हटलं आहे. हवामान बदलाचे हे संकेत पृथ्वी ग्रहाची जोखीम वाढवत असल्याच...

March 12, 2025 7:13 PM

views 37

येत्या २ दिवसात विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

येत्या २ दिवसात विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आज अकोल्यात सर्वाधिक ३९ पूर्णांक ५ अंश सेल्सियस तपमानाची नोंद झाली. नाशिक आणि परिसरातही आज तीव्र उष्णता जाणवत होती.