December 27, 2024 10:38 AM

views 40

जलसंधारणाचं महत्त्व सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी पाणलोट यात्रा काढण्यात येणार

जलसंधारणाचं महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जानेवारी महिन्यापासून पाणलोट यात्रा काढण्यात येणार असल्याचं, मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी सांगितलं आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं, जल व भूमी व्यवस्थापन संस्था-वाल्मीत बैठक झाल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.   वाल्मीला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी ५४६ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून, शासनस्तरावर पाठपुरावा, अधिक अनुदान मागणी तसंच पदभरतीचे प्रस्ताव मार्गी लावणार असल्याचं, राठोड यांनी सांगितलं.