January 1, 2025 2:30 PM

views 32

मणिपूरमधल्या हिंसाचारामुळे स्थलांतरित व्हावं लागलेल्या नागरिकांना राज्य सरकार ५०हजार रुपयांपर्यंतचं कर्ज विनातारण देणार

मणिपूरमधल्या हिंसाचारामुळे स्थलांतरित व्हावं लागलेल्या नागरिकांना राज्य सरकार ५०हजार रुपयांपर्यंतचं कर्ज विनातारण देणार आहे. मुख्यमंत्री उद्योजकता सहाय्य योजनेतून हे कर्ज देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एन. बीरेन सिंग यांनी काल केली. या योजनेअंतर्गत याआधीच ४२६ लोकांना व्यवसायासाठी कर्ज दिल्याचं त्यांनी सांगितलं.