January 19, 2026 1:17 PM

views 34

विकसित भारत जी राम जी योजनेबाबत काँग्रेस दिशाभूल करत असल्याची कृषीमंत्र्यांची टीका

विकसित भारत जी राम जी योजनेबाबत काँग्रेस जनतेची दिशाभूल करत असल्याची टीका केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली आहे. नवी दिल्ली इथं आज ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यापूर्वीच्या मनरेगा योजनेतून काँग्रेसने दिलेले हक्क केवळ कागदावर राहिले असं सांगून ते म्हणाले की, काँग्रेसने आपल्या आदर्श आणि कल्पनांशी फारकत घेतली आहे.   मनरेगामधून १० कोटी बांधकामं झाली त्यातली साडेआठ कोटी कामं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं केली आहेत असं ते म्हणाले. या स...

December 29, 2025 3:02 PM

views 99

VB-G RAM G कायद्यामुळे राज्य सरकारांना १७ हजार कोटी रुपयांचा नफा होणार – SBI

ग्रामीण रोजगारासाठीच्या व्हीबी जी राम जी या कायद्यामुळे राज्य सरकारांना गेल्या ७ वर्षांच्या तुलनेत १७ हजार कोटी रुपयांचा नफा होणार आहे. तसंच राज्यांच्या निधी वितरणात देखील सुधारणा होईल, असं स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका अहवालात म्हटलं आहे. उत्पादक मालमत्ता निर्मितीला चालना देणं, उत्पन्नात वाढ करणं तसंच नियमन प्रणाली कार्यक्षम करणं हे या कायद्यामुळे साध्य होणार आहे. पारदर्शकता, नियोजन, तसंच  जबाबदारी ठरवून रोजगार निर्मिती केल्यामुळे आधीच्या कायद्यातल्या संरचनात्मक त्रुटी नव्या कायद्यामुळे दूर होतील...