November 7, 2025 10:26 AM

views 43

भारताला मोठ्या आणि जागतिक दर्जाच्या बँकांची गरज असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री यांचं प्रतिपादन

भारताला मोठ्या आणि जागतिक दर्जाच्या बँकांची गरज आहे; आणि या संदर्भात काम सुरू झालं असल्याचं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितरामण यांनी केलं आहे. भारतीय स्टेट बँकेच्या वतीनं, काल मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या 12 व्या बँकिंग आणि अर्थशास्त्र परिषदेत त्या बोलत होत्या.   केंद्र सरकारनं २०१४ पासून व्यवसाय सुलभतेसाठी असंख्य सुधारणात्मक उपाययोजना केल्या असून, धोरणात्मक सातत्य आणि पारदर्शकतेमुळे गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळालं असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. वस्तू आणि सेवा करात करण्यात आले...

December 11, 2024 1:44 PM

views 15

सरकार आणि उद्योगांनी जगभरात एकत्र येऊन काम करण्याची गरज – अर्थमंत्री निर्मला सीतारामन

जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी सरकार आणि उद्योगांनी जगभरात एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सांगितलं. नवी दिल्लीत भारतीय उद्योग संघाद्वारे आयोजित जागतिक आर्थिक धोरण मंचाच्या मेळाव्यात ‘जागतिक अर्थव्यवस्थेेसाठी दशकभराची प्राथमिकता’ या विषयावर त्या बोलत होत्या. जागतिक पातळीवरची परिस्थिती सामान्य करणं ही आजची प्राथमिकता आहे, असं सीतारामन म्हणाल्या. महागाई हे जगासमोरचं मोठं आव्हान असून देशादेशातील संघर्ष यामागचं कारण आहे, असंही त्यांनी सांगितलं.

November 12, 2024 10:09 AM

views 18

केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवी दिल्ली इथं AIIB च्या शिष्टमंडळासोबत घेतली बैठक

केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी काल नवी दिल्ली इथं एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक अर्थात AIIB च्या शिष्टमंडळासोबत बैठक घेतली. गेल्या काही वर्षांत बँकेची झालेली उल्लेखनीय वाढ आणि कामगिरीबद्दल अर्थमंत्र्यांनी बँकेचं कौतुक केलं. बँकेची प्रशंसा करतानाच त्यांनी भारताच्या भक्कम स्थूल आर्थिक नियोजनामधील मूलभूत आर्थिक गोष्टी आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यात तसंच त्याचा उपयोग करण्यासाठी वापरण्यात आलेल्या प्रेरणादायी भारतीय नेतृत्वाचा उल्लेख...