January 28, 2025 3:47 PM

views 40

महिलांच्या १९ वर्षाखालील T20 विश्वचषक स्पर्धेत भारताचा १५० धावांनी विजय

१९ वर्षांखालील महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत सुपर सिक्स गटाच्या अंतिम सामन्यात भारताने स्कॉटलंडवर दीडशे धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. भारताच्या २०९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना स्कॉटलंडचा संघ १४ षटकांत केवळ ५८ धावांवरच गडगडला. स्कॉटलंडची सुरुवात ही चाचपडत झाली. अवघ्या १३ धावांवर पिप्पा केली हिच्या रुपाने स्कॉटलंडला पहिला झटका बसला. त्यानंतर  स्कॉटलंडच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करण्यात यश आलं नाही. भारताच्या आयुषी शुक्लानं चार गडी बाद केले. तर वैष्णवी शर्मा आणि गोंगदी त्रिशा यांनी प्र...

January 28, 2025 1:43 PM

views 38

महिलांच्या १९ वर्षाखालील T20 विश्वचषक स्पर्धेत भारताचे स्कॉटलंडसमोर २०९ धावांचं आव्हान

१९ वर्षांखालील महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत सुपर सिक्सच्या फेरीतल्या अंतिम सामन्यात भारतानं स्कॉटलंडसमोर २०९ धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारताची सलामीवीर गोंगदी त्रिशाने नाबाद ११० धावा केल्या. अवघ्या ५९ चेंडूंमध्ये १३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने तिनं ही कामगिरी केली. जी कमलीनी हिने अर्धशतक केलं. त्याआधी स्कॉटलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.  भारताने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत याआधीच प्रवेश केला आहे. तर ब गटामध्ये दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांनी अंतिम चारमधे आपल...

July 5, 2024 9:35 AM

views 40

विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचं चाहत्यांकडून जल्लोषात स्वागत

टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक जिंकून बार्बाडोसहून मायदेशी परतलेल्या भारतीय संघाची, काल मुंबईत लाखो क्रिकेटप्रेमींच्या साक्षीनं अत्यंत जल्लोषात विजयी मिरवणूक काढण्यात आली. मरीन ड्राईव्हपासून वानखेडे स्टेडीयमपर्यंत खुल्या बसमधून निघालेल्या या मिरवणुकीच्या वेळी रस्त्याच्या दुतर्फा जमलेले चाहते हातात तिरंगा घेऊन, आणि आपल्या लाडक्या खेळाडूंच्या नावाच्या घोषणा देत त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत होते. तत्पूर्वी काल सकाळी दिल्लीत भारतीय संघानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली....

July 1, 2024 1:32 PM

views 47

T-२० विश्वचषक विजेत्या पुरुष क्रिकेट संघासाठी बी.सी.सी.आय कडून, १२५ कोटी रुपयांची बक्षीसं जाहीर

टी-२० विश्वचषक चषकाला गवसणी घातलेल्या भारतीय पुरुष क्रिकेट संघासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं १२५ कोटी रुपयांच्या पुरस्कारांची घोषणा केली आहे. शनिवारी रात्री बार्बाडोस मधील भारताच्या विजयानंतर नियामक मंडळाचे सचिव जय शहा यांनी भारतीय खेळाडूंचं अभिनंदान केलं आणि ही घोषणा केली.  

June 30, 2024 1:33 PM

views 40

T20 क्रिकेट विश्वचषक १७ वर्षांनी जिंकणाऱ्या भारतीय संघावर अभिनंदनाचा वर्षाव

टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक तब्बल १७ वर्षांनी जिंकणाऱ्या भारतीय संघावर चहूकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भारताच्या या विजयानंतर देशभरात क्रिकेटप्रेमींच्या जल्लोषाला उधाण आलं होतं, मुंबई, चेन्नई, बंगळूरू, हैद्राबाद, दिल्ली या शहरांसह जागोजागी रस्त्यांवर तिरंगा फडकावत क्रिकेट प्रेमींनी विजयोत्सव साजरा केला.  भारतीय क्रिकेट संघाच्या या कामगिरीनं देशाच्या कानाकोपऱ्यातील लोकांचं हृदय जिंकलं अशा शब्दांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही संपूर्ण स्पर्ध...

June 28, 2024 3:04 PM

views 42

टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाची तिसऱ्यांदा अंतिम सामन्यात धडक

टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत, गतविजेत्या इंग्लंडचा पराभव करुन भारतीय संघानं तिसऱ्यांदा अंतिम सामन्यात धडक मारली आहे. पावसामुळे नाणेफेकीला उशीर झाल्यानंतर इंग्लंडनं नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. फलंदाजीसाठी प्रतिकूल खेळपट्टीवर भारतीय संघानं पहिले दोन गडी झटपट गमावले, त्यानंतर पावसाने हजेरी लावली.   खेळ पुन्हा सुरू झाल्यानंतर रोहित शर्माच्या ५७ आणि सूर्यकुमार यादवच्या ४७ धावांच्या जोरावर भारतीय संघाने १७१ धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी चोख कामगिरी बज...

June 28, 2024 12:01 PM

views 56

टी २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत उद्या अंतिम सामन्यात भारताची दक्षिण आफ्रिकेशी लढत

टी२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत, उद्या गायना मध्ये भारताचा दक्षिण आफ्रिकेशी अंतिम सामना होणार आहे. काल भारताच्या फिरकी गोलंदाजांच्या भेदक माऱ्याच्या आणि कर्णधार रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडला माघारी पाठवत भारतीय संघानं तिसऱ्यांदा अंतिम सामन्यात धडक मारली आहे.   पावसामुळं नाणेफेकीला उशीर झाल्यानंतर इंग्लंडनं नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. पहिले दोन गडी झटपट गमावल्यानंतर, पावसाने हजेरी लावली. त्यानंतर मात्र रोहित शर्माच्या ५७ आणि सूर्यकुमार यादवच्या ४७ धावांच्...

June 26, 2024 11:10 AM

views 51

टी २० विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतासह इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानचा प्रवेश

टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान हे संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. उपांत्य फेरीतला दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यातला सामना उद्या सकाळी 6 वाजता त्रिनिदादमध्ये तारौबा इथं होणार आहे तर भारत आणि इंग्लंड यांच्यातला सामनाही उद्याच गयाना इथं रात्री 8 वाजता होणार आहे. अंतिम सामना शनिवारी बार्बाडोसच्या ब्रिजटाऊन इथं खेळला जाईल.

June 23, 2024 2:55 PM

views 58

20 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बांग्लादेशवर मात

टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा बांगलादेशवर ५० धावांनी विजय टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल रात्री झालेल्या सामन्यात भारतानं बांगलादेशचा ५० धावांनी सहज पराभव केला. अँटीग्वा इथल्या सर व्हिव्हियन रिचर्ड्स मैदानावर झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित २० षटकांमध्ये पाच गड्यांच्या मोबदल्यात १९६ धावांचं मोठं आव्हान बांगलादेशसमोर ठेवलं. हार्दिक पंड्यानं फक्त २७ चेंडूंमध्ये ५० धावा फटकावल्या, तर ऋषभ पंतनं २८ चेंडूंमध्ये ३७ धावा केल्या. १९७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करता...

June 21, 2024 9:24 AM

views 58

टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा अफगाणिस्तानवर ४७ धावांनी विजय

आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सुपर एटमधील सामन्यात काल भारतानं अफगाणिस्तानचा ४७ धावांनी पराभव केला. बार्बाडोसमधील ब्रिजटाऊनच्या केन्सिंग्टन ओव्हल इथं झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतानं अफगाणिस्तानसमोर १८२ धावांचं आव्हान ठेवलं होतं, पण अफगाणिस्तानचा संघ निर्धारित २० षटकांत केवळ १३४ धावाच करू शकला. २८ चेंडूत ५३ धावा करणारा भारताचा सूर्यकुमार यादव सामनावीर ठरला.