December 12, 2025 10:46 AM

views 51

वीस षटकांच्या दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा भारतावर विजय

चंदीगड इथं काल झालेल्या वीस षटकांच्या दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं भारतावर 51 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना पाहुण्यांच्या 4 बाद 213 धावा झाल्या. उत्तरादाखल भारतीय संघ सर्वबाद 162 धावाच करु शकला. पाच सामन्यांच्या या मालिकेत आता दोन्ही संघांची 1-1 अशी बरोबरी झाली आहे. तिसरा सामना येत्या 14 डिसेंबरला धरमशाला इथं होणार आहे.   दरम्यान आशियाई क्रिकेट परिषदेच्या 19 वर्षांखालील आशिया कप 2025 ला आज दुबईमध्ये सुरू होत आहे. आयुष म्हात्रे याच्या नेतृत्वाखालील भारत आणि यजमान संयुक्त अरब अमिर...

December 9, 2025 9:25 AM

views 67

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात

भारत आणि दक्षिणआफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-ट्वेंटी क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे.सलामीचा सामना आज संध्याकाळी सात वाजता ओडिशातल्या कटक इथल्या बाराबती मैदानावर खेळण्यात येणार आहे.   यामालिकेतील दुसरा सामना गुरुवारी चंदीगडमधील मुल्लानपूर इथं तर तिसरा सामना धर्मशाळा इथं, चौथा सामना लखनऊमध्ये आणि शेवटचा सामना अहमदाबादमधीलनरेंद्र मोदी मैदानावर होईल. 

July 14, 2024 8:10 PM

views 35

पाचव्या आणि अखेरच्या टी-ट्वेंटी सामन्यात भारताचा झिम्बाव्वेवर ४२ धावांनी विजय

पाचव्या आणि अखेरच्या टी-ट्वेंटी सामन्यात भारतानं झिम्बाव्वेचा ४२ धावांनी पराभव करत पाच सामन्यांची मालिकाही ४-१ अशी जिंकली. या सामन्यात झिम्बाव्वेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतानं संजू सॅमसन याच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर निर्धारीत २० षटकांत ६ बाद १६७ धावा केल्या. विजयासाठी १६८ धावांचा पाठलाग करताना, झिम्बाव्वेचा डाव १८ षटकं आणि ४ चेंडुतच १२५ धावांत आटोपला. भारताच्या वतीनं मुकेश कुमार यानं सर्वाधिक ४ गडी बाद केले.