March 23, 2025 3:32 PM

views 179

हुतात्मा क्रांतिकारक भगत सिंग, राजगुरु आणि सुखदेव यांना देशाची आदरांजली

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातले तीन वीर क्रांतिकारक भगत सिंग, राजगुरु आणि सुखदेव यांना संपूर्ण देश आज श्रद्धांजली वाहत आहे. १९३१ मध्ये आजच्याच दिवशी लाहोरच्या मध्यवर्ती तुरुंगात या तीन वीरांना फाशी देण्यात आली होती. या दिवसाचं शहीद दिन म्हणून स्मरण करण्यात येतं.   प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या तिन्ही वीरांना श्रद्धांजली वाहिली आहे. समाजमाध्यमावर मोदी यांनी भगत सिंह, सुखदेव आणि राजगुरू यांच्या बलिदानाचं स्मरण केलं आहे. स्वातंत्र्य आणि न्यायासाठी या क्रांतीकारकांनी दाखवलेलं दुर्दम्य साहस आणि ...