June 20, 2024 8:27 PM

views 34

राहुल गांधी नीट प्रकरणाचं राजकारण करत आहेत – सुधांशु त्रिवेदी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना विद्यार्थ्यांच्या भविष्याशी काही देणंघेणं नसून ते नीट प्रकरणाचं राजकारण करत आहेत, अशी टीका भाजपाचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी आज केली. सरकार नीट प्रकरणाबाबत संवेदनशील असून विद्यार्थ्यांवर कुठलाही अन्याय होणार नाही. तसंच दोषींवर कारवाई केली जाईल अशी ग्वाही त्रिवेदी यांनी दिली.   त्याआधी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नीट परीक्षेतल्या अनियमिततेला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. तसंच हे राष्ट्रीय संकट असून सरकारने यावर काहीही प्रतिक्रि...