October 15, 2024 2:30 PM

views 59

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सचिव स्तरावरची नवी दिल्लीत चर्चा 

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सचिव स्तरावरची चर्चा नवी दिल्लीत झाली. संरक्षण सचिव गिरीधर अरमाने आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यात सहभागी झाले होते. यावेळी राजकीय, संरक्षण, सुरक्षा, प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा झाली. भारत प्रशांत क्षेत्रात शांतता, स्थैर्य राखणं तसंच भारत - ऑस्ट्रेलिया सर्वंकष भागिदारीवरही यावेळी चर्चा झाली.