January 19, 2026 1:04 PM

views 111

२०३० पर्यंत भारताचं दरडोई उत्पन्न ४ हजार डॉलर्सच्या पुढे जाईल – SBI

२०३० पर्यंत भारताचं दरडोई उत्पन्न ४ हजार डॉलर्सच्या पुढे जाईल असं स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अहवालात म्हटलं आहे. यामुळे जागतिक बँकेच्या वर्गवारीनुसार भारत चीन आणि इंडोनेशियाच्या रांगेत जाऊन बसणार आहे. भारताला एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनायला साठ वर्षं लागली मात्र २०१४ नंतर केवळ सात वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था दोन ट्रिलियन आणि पुढल्या सात वर्षात तीन ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचली आहे. तर २०२५ मधे अर्थव्यवस्थेने चार ट्रिलियन डॉलरचा टप्पा गाठला. पुढल्या दोन वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन ...

December 29, 2025 3:02 PM

views 99

VB-G RAM G कायद्यामुळे राज्य सरकारांना १७ हजार कोटी रुपयांचा नफा होणार – SBI

ग्रामीण रोजगारासाठीच्या व्हीबी जी राम जी या कायद्यामुळे राज्य सरकारांना गेल्या ७ वर्षांच्या तुलनेत १७ हजार कोटी रुपयांचा नफा होणार आहे. तसंच राज्यांच्या निधी वितरणात देखील सुधारणा होईल, असं स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका अहवालात म्हटलं आहे. उत्पादक मालमत्ता निर्मितीला चालना देणं, उत्पन्नात वाढ करणं तसंच नियमन प्रणाली कार्यक्षम करणं हे या कायद्यामुळे साध्य होणार आहे. पारदर्शकता, नियोजन, तसंच  जबाबदारी ठरवून रोजगार निर्मिती केल्यामुळे आधीच्या कायद्यातल्या संरचनात्मक त्रुटी नव्या कायद्यामुळे दूर होतील...

November 25, 2025 3:21 PM

views 80

नवीन कामगार कायद्यांमुळे बेरोजगारीत १.३ दशांश टक्केपर्यंत घट होईल- SBI

नवीन कामगार कायद्यांमुळे ७७ लाख अतिरिक्त रोजगार निर्माण होऊन बेरोजगारीत १ पूर्णांक ३ दशांश टक्क्यांपर्यंत घट होईल, असा अंदाज भारतीय स्टेट बँकेच्या एका अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. २१ नोव्हेंबरपासून लागू झालेल्या या कायद्यांमुळं संघटित कामगारांचं प्रमाण किमान १५ टक्क्यांनी वाढून सुमारे साडे ७५ टक्क्यांपर्यंत जाईल.   आजघडीला हे प्रमाण ६० पूर्णांक ४ दशांश टक्के असल्याचा अंदाज आहे. सध्या देशभरात असंघटित क्षेत्रातल्या कामगारांची संख्या सुमारे ४४ कोटी इतकी असून त्यापैकी जवळपास ३१ कोटी कामगारां...

October 8, 2025 8:06 PM

views 99

बँकेची केवायसी प्रक्रिया सुलभ करण्याचा प्रयत्न – SBIचे अध्यक्ष सी. एस. शेट्टी

बँकेची केवायसी प्रक्रिया सुलभ करण्याचा प्रयत्न असल्याचं स्टेट बँकेचे अध्यक्ष सी. एस. शेट्टी यांनी म्हटलं आहे. मुंबईत आज फिनटेक फेस्टमध्ये शेट्टी बोलत होते. यूपीआय वापरकर्ते आता डेबिट कार्डाशिवाय कोणत्याही बँकेच्या एटीएममध्ये रोख रक्कम जमा करू शकणार आहेत. तसंच, कर्जाचा हप्ताही भरणं आणि थर्ड पार्टी व्यवहार करणंही आता याच माध्यमातून शक्य होणार आहे.