December 23, 2024 1:31 PM

views 19

तरूणांना सक्षम बनवण्याला केंद्र सरकार महत्व देत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

तरूणांच्या क्षमता आणि कलागुणांचा पूरेपूर वापर करून या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून तरूणांना सक्षम बनवण्याला केंद्र सरकार प्राधान्य देत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आयोजित रोजगार मेळाव्याला संबोधित करत होते.  देशभरात ४५ ठिकाणी असे रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले असून गृह मंत्रालय, टपाल कार्यालय, उच्च शिक्षण विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग यांसारख्या विविध मंत्रालयांमध्ये ७१ हजारांहून अधिक नियुक्तीपत्...