February 28, 2025 4:01 PM

views 70

‘धनगर समाजाने ST प्रवर्गात आरक्षण मागण्याऐवजी OBC प्रवर्गातलं आरक्षण टिकवावं’

धनगर समाजाने एसटी प्रवर्गात आरक्षण मागण्याऐवजी ओबीसी प्रवर्गातलं आरक्षण टिकवावं, असं ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे. लातूर इथे ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्यावरही टीका केली. वारंवार उपोषणाला बसून जरांगे यांनी लोकशाहीतल्या उपोषणासारख्या अस्त्राचाही खेळखंडोबा केल्याची टीका हाके यांनी केली आहे. कुणबी दाखल्याबाबत राज्य सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची मागणीही हाके यांनी केली. 

November 12, 2024 8:13 PM

views 44

मुस्लिमांना आरक्षण देण्यासाठी कुणाचं आरक्षण कमी करणार ? – गृहमंत्री अमित शाह

भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज मुंबईत घाटकोपरमधे प्रचारसभा घेतली. मुस्लिम धार्मिक नेत्यांनी १० टक्के आरक्षण मागितलं आहे. मात्र हे आरक्षण देण्यासाठी कुणाचं आरक्षण कमी करणार असा प्रश्न त्यांनी विरोधी पक्षांना केला.    राम मंदिर बांधण्याचं आश्वासन आम्ही दिलं होतं, ते पूर्ण केलं. काशी विश्वनाथ कॉरिडॉरही तयार केला. वक्फमधे सुधारणा करण्याचा प्रयत्न केला आणि याबाबतच्या कायद्यात दुरुस्ती केली जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं. कोणतीही जमीन अशीच वक्फची होऊ शकत नाही, असं ते म्...

October 5, 2024 9:21 AM

views 45

आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांवरून ७५ टक्क्यांवर नेण्याची शरद पवार यांची मागणी

केंद्र सरकारने आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांवरून ७५ टक्क्यांवर नेण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी केली आहे. ते काल सांगली इथं पत्रकारांशी बोलत होते. यासाठी संसदेत सरकारने विधेयक आणल्यास आपण पाठिंबा देऊ, असं पवार यांनी सांगितल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

August 12, 2024 3:18 PM

views 85

आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यापेक्षा जास्त वाढवण्यासाठी पाठिंबा – शरद पवार

महाराष्ट्रात आरक्षणासंबंधाने दोन समाजात कटुता निर्माण होणार नाही, याची काळजी सर्वांनी घ्यायला हवी, यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावून यावर तोडगा काढावा असं राष्ट्रवादी काँग्रेस शरच्चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. राज्यातलं सामाजिक वातावरण व्यवस्थित ठेवण्याची काळजी सर्वांनी घ्यायला हवी असं आपल्याला वाटतं, यासाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना सर्वपक्षीय बैठक बोलावून तोडगा काढण्याविषयी सुचवलं, असं पवार म्हणाले...

August 6, 2024 7:20 PM

views 39

आरक्षणाचा प्रश्न प्रधानमंत्र्यांनी पुढाकार घेऊन सोडवावा – नाना पटोले

आरक्षणाचा प्रश्न प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेऊन सोडवावा, असं आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते.  आरक्षणाच्या प्रश्नावरून भाजपानं मराठा आणि ओबीसी समाजाची दिशाभूल करुन सामाजिक एकोप्याला बाधा पोहचवली जात आहे. आरक्षणाचा निर्णय सत्तेत बसलेल्या लोकांना घ्यायचा असताना विरोधी पक्षांनाच ते त्याबद्दल विचारत आहेत. वास्तविक हे काम केंद्र सरकारचं असून त्यांनीच हा निर्णय घ्यावा असल्याचं पटोले यांनी सांगितलं.

July 30, 2024 7:25 PM

views 41

आरक्षणाच्या प्रश्नावर सर्व समाजाच्या नेत्यांशी चर्चा करुन तोडगा काढण्याची उद्धव ठाकरे यांची मागणी

आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सर्व समाजाच्या नेत्यांना बोलावून चर्चा करावी आणि सर्वमान्य तोडगा काढावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. आरक्षणाचा प्रश्न लोकसभेतच सुटू शकतो, हे अधिकार राज्यांना नाहीत, असं ते म्हणाले. केंद्र सरकार आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासंदर्भात तोडगा काढत असेल तर आमच्या पक्षाचा पाठिंबा असेल, असं त्यांनी सांगितलं. मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे, असं ते म्हणाले. धारावीतल्या रहिवाशांना ...

July 17, 2024 8:20 PM

views 42

पोलीस आणि इतर विभागातल्या काही पदांवर थेट भर्तीत अग्निवीरांना १० % समांतर आरक्षण, हरयाणा सरकारची घोषणा

पोलीस, खाणकाम आणि तुरुंग विभागातल्या काही पदांवर थेट भर्ती करताना, हरयाणा सरकार अग्निवीरांना १० टक्के समांतर आरक्षण देणार आहे. मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी आज चंदीगढ इथे वार्ताहरांशी बोलताना ही घोषणा केली. हरयाणातल्या पोलिस हवालदार, खाण रक्षक, वनरक्षक, कारागृह अधीक्षक आणि विशेष पोलिस अधिकारी, या पदांचा यात समावेश आहे, असं ते म्हणाले.   ड गटात भर्ती करताना, अग्निवीरांना वयात ३ वर्षांची सवलत दिली जाईल आणि पहिल्या तुकडीसाठी ही सवलत पाच वर्षांची असेल, असंही त्यांनी सांगितलं. अग्निवीरांना गट...

July 12, 2024 12:18 PM

views 49

माजी अग्निवीरांसाठी केंद्रीय सुरक्षा दलांच्या भरती प्रक्रियेत १० टक्के आरक्षण

माजी अग्निवीरांसाठी केंद्रीय सुरक्षा दलांच्या भरती प्रक्रियेत दहा टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. यामध्ये सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलीस दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि सशस्त्र सीमा बल या केंद्रीय सुरक्षा दलांचा समावेश आहे. माजी अग्निवीरांना वयोमर्यादेच्या अटीमध्ये देखील सवलत मिळेल, तसंच त्यांच्यासाठी कोणतीही शारीरिक क्षमता चाचणी होणार नाही. या निर्णयाद्वारे गृह मंत्रालयांनं एक मोठं पाऊल उचललं आहे, असं केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या महासंचालक नीना सिंग यां...

June 20, 2024 6:53 PM

views 42

बिहारमधलं वाढीव आरक्षण उच्च न्यायालयाकडून रद्दबातल

बिहार सरकारनं मागास, अति मागास, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी सरकारी नोकऱ्या आणि शिक्षण संस्थांमधे लागू केलेलं वाढीव आरक्षण पाटणा उच्च न्यायालयानं आज रद्दबातल ठरवलं. सर्वोच्च न्यायालयानं निर्धारित केलेल्या ५० टक्के आरक्षणाच्या मर्यादेत बदल करून बिहार सरकारनं हे आरक्षण ६५ टक्क्यापर्यंत वाढवलं होतं. हे आरक्षण लागू करणाऱ्या बिहार आरक्षण कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या अनेक याचिकांवरचा निकाल उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तीं के विनोद चंद्रन आणि न्यायमूर्ती हरिश कुमार यांच्या ख...