August 13, 2026 8:00 PM

views 529

संसदेचं पावसाळी अधिवेशन संस्थगित, लोकसभेत १९ टक्के तर राज्यसभेत ३९ टक्के कामकाज

   गेल्या २० तारखेपासून सुरू झालेलं संसदेचं पावसाळी अधिवेशन आज संस्थगित झालं. या अधिवेशनात लोकसभेत १९ टक्के तर राज्यसभेत ३९ टक्के कामकाज झालं.

December 11, 2025 4:01 PM

views 67

राज्यसभेत आज निवडणूक सुधारणांबाबत चर्चा सुरू

 आहे. काँग्रेस नेते अजय माकन यांनी चर्चेला सुरुवात केली. सर्व राजकीय पक्षांना समान संधी, पारदर्शकता आणि विश्वसनीयता या तीन कसोट्यांवर टिकणारी व्यवस्थाच जिवंत लोकशाही असते, मात्र या तिन्ही गोष्टींवर सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे, असा आरोप त्यांनी केला. या विषयावर सध्या राज्यसभेत चर्चा सुरू आहे.    तत्पूर्वी, वंदे मातरम या गीताच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवानिमित्तच्या चर्चेचा समारोप सभागृह नेते जे. पी. नड्डा यांनी केला. वंदे मातरम हा देशाचा आत्मा जागृत करण्याचा मंत्र आणि देशाच्या पुनर्निर्...

December 9, 2025 8:16 PM

views 76

विकसित भारतालाही वंदे मातरमची गरज असेल – गृहमंत्री अमित शहा

स्वातंत्र्य लढ्यावेळीच नव्हे तर आज आणि २०४७मध्ये विकसित भारत झाल्यानंतरही वंदे मातरम या गीताची गरज भासेल, असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज केलं. ते राज्यसभेत वंदे मातरम या गीताच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विशेष चर्चेला प्रारंभ करताना बोलत होते. दोन्ही सभागृहांमध्ये वंदे मातरम या गीतावरची चर्चा ही भावी पिढ्यांना या गीताचं महत्त्व समजण्यासाठी मदत करे, असं शहा म्हणाले.   Rajyaस्वातंत्र्यलढ्यावेळी काँग्रेसने वंदे मातरम हेच ध्येय आणि घोषणा बनवली, असं राज्यसभेतले वि...

April 3, 2025 3:36 PM

views 77

वक्फ सुधारणा विधेयकावर राज्यसभेत चर्चा सुरू

वक्फ सुधारणा विधेयकावर राज्यसभेत चर्चा सुरू आहे.  संयुक्त संसदीय समितीत सखोल चर्चा केल्यानंतरच हे विधेयक आणण्यात आल्याचं अल्पसंख्यक कार्य मंत्री किरेन रिजिजू यांनी विधेयक मांडताना सांगितलं.  वक्फच्या मालमत्तेत मुस्लिमेतर व्यक्ती हस्तक्षेप करणार नाही, याचा लाभ केवळ मुस्लिम व्यक्तींनाच मिळेल, असं रिजीजू यांनी स्पष्ट  केलं. या विधेयकाचा हेतू वक्फ मालमत्तांचं व्यवस्थापन करणं असून मुस्लिमांच्या  धार्माचरणात हस्तक्षेप करण्याचा नाही असंही त्यांनी सांगितलं.    वक्फ सुधारणा विधेयक आणून सरकार समाजात ...

April 3, 2025 2:45 PM

views 55

राज्यसभेतून विरोधी सदस्यांचा सभात्याग

काँग्रेस अध्यक्ष आणि खासदार मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर भाजपा खासदार अनुराग ठाकूर यांनी काल लोकसभेत जमीन हडपल्याचा आरोप केला होता. या  निषेधार्थ आज विरोधी सदस्यांनी राज्यसभेतून सभात्याग केला. अनुराग ठाकूर यांनी माफी मागावी, अशी मागणी यावेळी त्यांनी केली.   राज्यसभेत अशा प्रकारे कोणाचीही प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करण्यात येऊ नये अशी अपेक्षा राज्यसभा अध्यक्ष जगदीप धनखड यांनी यावेळी व्यक्त केली. त्यांनी आचारसंहिता समितीला या संदर्भात निश्चित पद्धती निर्माण करावी  असं आवाहनही केले.  सभागृहा...

March 21, 2025 3:05 PM

views 63

RajyaSabha : दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या निवासस्थानी रोख रक्कम जप्त करण्याचा मुद्दा गाजला

दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जप्त करण्यात आल्याचा मुद्दा आज राज्यसभेतही गाजला. काँग्रेस खासदार जयराम रमेश यांनी शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित केला. सभापती जगदीप धनखड यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून या अधिवेशनातच सभागृह नेते आणि विरोधी पक्षनेते यांच्याशी या मुद्द्यावर चर्चा केली जाईल, असं त्यांनी यावेळी सांगितलं.   राज्यसभेत आज गृह मंत्रालयाच्या कामकाजावर पुन्हा चर्चा झाली.  भाजपचे डॉ. सुधांशू त्रिवेदी यावेळी म्हणाले की, गृह ...

February 11, 2025 8:18 PM

views 56

राज्यसभेत अर्थसंकल्पावर चर्चा

पुन्हा सुरू झाली. सरकारने घेतलेल्या सक्रिय उपाययोजनांमुळे राजकोषीय तूट चार दशांश टक्क्याने कमी झाल्याचं भाजप खासदार भागवत कराड या चर्चेवेळी म्हणाले. मजबूत पायाभूत सुविधा आणि इतर क्षेत्रांमध्ये देशाने लक्षणीय प्रगती पाहिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली येत्या काळात देश जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला.    केंद्रीय अर्थसंकल्पात शिक्षणासाठीची तरतूद फक्त सात टक्के वाढवण्याबद्दल अपक्ष खासदार कपिल ...

February 10, 2025 8:19 PM

views 55

विद्यमान सरकारच्या काळात देशाचा आर्थिक विकास दर घसरला – काँग्रेस खासदार पी. चिदंबरम

राज्यसभेत आज अर्थसंकल्पावरची चर्चा सुरू झाली. विद्यमान सरकारच्या काळात देशाचा आर्थिक विकास दर घसरला आहे, असा आरोप माजी अर्थमंत्री आणि काँग्रेस खासदार पी. चिदंबरम यांनी केला. बेरोजगारीबद्दलची निश्चित आकडेवारी सरकारनं दिली नसल्याची टीका त्यांनी केली. सध्या तरुणांमध्ये १० टक्के तर पदवीधरांमध्ये १३ टक्के बेरोजगारी दर आहे, मात्र सरकारनं देशात निव्वळ ३ पूर्णांक २ दशांश टक्के बेरोजगारी असल्याचं म्हटलं आहे, असा आरोप चिदंबरम यांनी केला.   या आरोपांना उत्तर देताना सभागृहाचे नेते जे पी नड्डा यांनी सरक...

December 16, 2024 7:27 PM

views 53

राज्यसभेत भारताच्या राज्यघटनेच्या अमृतमहोत्सवी वाटचालीवर विशेष चर्चा

काँग्रेसनं राज्यघटनेत ज्या सुधारणा केल्या त्या लोकशाहीला बळकट करण्यापेक्षा स्वत:च्या कुटुंबाला मदत म्हणून आणि सत्ता वाचवण्यासाठी केल्या, असा आरोप केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज केला.  राज्यसभेत आज प्रश्नोत्तरांचा तास आणि शून्य प्रहराचं कामकाज बाजूला ठेवून राज्यघटनेच्या अमृतमहोत्सवी वाटचालीवर विशेष चर्चा झाली. या चर्चेची सुरुवात सितारामन यांनी केली. घटनासमितीच्या सदस्यांप्रति आदर व्यक्त करत त्यातल्या १५ महिला सदस्यांचा त्यांनी विशेष  उल्लेख केला. महिला कल्याण आणि महिला आरक्षणासाठी ...

December 16, 2024 3:14 PM

views 52

राज्यसभेत दोन दिवस राज्यघटनेवर विशेष चर्चा

राज्यघटनेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यघटनेवरील विशेष चर्चा आज राज्यसभेत सुरू होईल. भाजपानं आपल्या खासदारांसाठी तीन ओळींचा व्हिप जारी करुन सर्व खासदारांनी आज आणि उद्या राज्यसभेत हजर राहावं असे आदेश दिले आहेत.