December 20, 2025 6:36 PM

views 50

श्रीकृष्ण आणि हनुमान हे जगातले सर्वात मोठे आणि कुशल ‘मुत्सद्दी’ – एस. जयशंकर

विकसित भारताचं परराष्ट्र धोरण महत्त्वाकांक्षी, दीर्घकालीन आणि क्षितीज विस्तारणारं हवं अशी अपेक्षा परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी व्यक्त केली आहे. पुण्यात सिम्बॉयसिस अभिमत विद्यापीठात दीक्षांत समारंभात ते बोलत होते.  जागतिक पातळीवर आर्थिक आणि राजकीय प्राधान्यक्रमात आमूलाग्र बदल झाले असून अनेक नवी सत्ताकेंद्रं तयार झाली आहेत. त्यामुळं जागतिक पातळीवर भारताचं स्थान बळकट करण्यासाठी अधिकाधिक देशांना सोबत घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. आज एखादा देश कितीही ताकदवान असला, तरी सगळ्याच बाबतीत तो आपलं ...