November 1, 2025 12:05 PM

views 68

भारत-इंग्लंड संबंध आता गतिमान आणि भागीदारीमध्ये विकसित झाले – परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर

भारत-इंग्लंड संबंध एका गुंतागुंतीच्या ऐतिहासिक संबंधापासून गतिमान आणि भविष्यकालीन भागीदारीमध्ये विकसित झाले असल्याचं परराष्ट्रमंत्री डॉ. एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. काल नवी दिल्लीमध्ये यूके राष्ट्रीय दिन समारंभात ते बोलत होते.   दोन्ही देश कनेक्टिव्हिटी, एआय आणि महत्त्वपूर्ण खनिजांच्या बाबतीतही एकमेकांना आवश्यक ते सहकार्य करतअसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.