June 17, 2024 3:35 PM

views 56

‘नवनीत राणांच्या पराभवामुळे अमरावतीचा विकास वीस वर्षे मागे गेला’

अमरावती लोकसभा मतदारसंघात अनेक विकासकामं केलेली असतानाही महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव झाल्यानं त्याचं चिंतन आपण करत असल्याचं स्वाभीमानी पक्षाचे नेते, आमदार रवी राणा यांनी आज वार्ताहर परिषदेत सांगितलं. तसंच नवनीत राणा यांच्या पराभवामुळे अमरावती जिल्ह्याचा विकास वीस वर्षे मागे गेला असंही ते म्हणाले. महाविकास आघाडीने अपप्रचार, खोटी आश्वासनं, खोटी प्रलोभनं देऊन जनतेची दिशाभूल केली असा आरोपही राणा यांनी केला.