September 21, 2025 6:50 PM

views 65

राज्यात ‘नमो युवा रन फॉर नशा मुक्त भारत’ कार्यक्रमाचा प्रारंभ

कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रभावी अंमलबजावणीनं  देश महासत्तेकडे वाटचाल करू शकतो. त्यामुळे राज्यात पोलीस व्यवस्थेच्या सुधारणांवर भर देण्यात आला असून सायबर सुरक्षेबरोबरच अमली पदार्थ संदर्भातल्या गुन्ह्यांप्रकरणी  राज्य शासनानं ‘झिरो टॉलरन्स धोरण’ अवलंबलं असल्याचं  प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी केलं आहे. भाजपा युवा मोर्चाच्या 'नमो युवा रन फॉर नशा मुक्त भारत' कार्यक्रमाचा प्रारंभ मुख्यमंत्र्यांनी आज मुंबईत केला, त्यावेळी ते बोलत होते. ‘नशामुक्त भारत, नशामुक्त महाराष्ट्र आणि नशामुक्त मुं...