November 12, 2025 7:01 PM

views 44

पंजाबमधल्या फिरोजपूर-पट्टी रेल्वे लिंक प्रकल्पाला मंजुरी

केंद्रसरकारने पंजाबमधल्या फिरोजपूर-पट्टी रेल्वे लिंक प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाची लांबी २५ किलोमीटर पेक्षा जास्त असून, तो पूर्ण झाल्यावर फिरोजपूर आणि अमृतसर दरम्यानचं  अंतर १९६ किलोमीटरवरून सुमारे १०० मीटर, इतकं कमी होईल. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंग बिट्टू यांनी आज चंदीगड इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली.    या प्रकल्पासाठी एकूण ७६४ कोटी १९ लाख रुपये खर्च अपेक्षित असून, हा संपूर्ण खर्च रेल्वे करणार असल्याचं ते म्हणाले.  हा प्रकल्प केवळ धोरणात्मक आणि आर्थिक दृष्टया...

June 30, 2025 1:32 PM

views 32

रेल्वेचा आरक्षण तक्ता आता रेल्वेगाडी सुटण्याच्या 8 तास आधी तयार करण्याच्या रेल्वेमंत्र्यांच्या सूचना

भारतीय रेल्वेकडून जाहीर करण्यात येणारा आरक्षण तक्ता आता रेल्वेगाडी निघण्याच्या आठ तास आधी तयार करण्यात यावा अश्या सूचना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेमंडळाला दिल्या आहेत. हा नियम टप्प्याटप्प्याने लागू होईल. यामुळे आरक्षणाच्या प्रतिक्षायादीत असलेल्या प्रवाशांना दिलासा मिळेल आणि प्रवासाची इतर पर्यायांचा विचार करता येईल. अशी माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली. भारतीय रेल्वे पुढील महिन्याच्या 1 तारखेपासून आयआरसीटीसी वेबसाइट आणि मोबाइल अॅपवर फक्त अधिकृत वापरकर्त्यांनाच तत्काळ तिकिटे आरक्षित करण...

February 3, 2025 8:46 PM

views 32

अर्थसंकल्पामध्ये देशातल्या रेल्वेसाठी २५२२०० कोटी रुपयांची तरतूद

देशातल्या रेल्वेच्या विकास आणि कार्यक्षमता वाढीसाठी अर्थसंकल्पामध्ये २ लाख ५२ हजार २०० कोटी रुपयांची तरतूद आहे. त्यापैकी नवीन रेल्वे मार्गांसाठी ३२ हजार २३५ कोटी रुपये, मार्गिकांच्या नूतनीकरणासाठी २२ हजार ८०० कोटी आणि रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणासाठी ३२ हजार कोटींची तरतूद आहे. १६ हजार २४० कोटींची नवीन रेल्वे मार्गिकांची कामं सुरु आहेत. या आर्थिक वर्षात ५० नव्या नमो भारत गाड्या, १०० नव्या अमृत भारत गाड्या आणि २०० नव्या वंदे भारत गाड्या सुरू करण्याची योजना आहे.

August 10, 2024 8:28 PM

views 67

जालना ते जळगाव या १७४ किलोमीटरच्या रेल्वेमार्गाला रेल्वे मंत्रालयाची मंजुरी

मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला जोडणाऱ्या जालना ते जळगाव या १७४ किलोमीटरच्या  रेल्वेमार्गाला रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. नांदेडच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीती सरकार यांनी आज बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली. या प्रकल्पासाठी ७ हजार १६० कोटी रुपये खर्च येणार असून, येत्या ४ ते ५ वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होईल असं त्यांनी सांगितलं. कैलास, वेरुळ, अजिंठा या जागतिक वारसा  ठिकाणी जाणाऱ्या पर्यटकांसाठी हा  रेल्वेमार्ग सोयीचा ठरेल असं त्या म्हणाल्या.