June 13, 2025 10:35 AM

views 27

अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याचं परराष्ट्र मंत्रालयाचं आवाहन

अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांना योग्य ती सुरक्षा खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. लॉस एंजेलिसमधील परिस्थितीबद्दल काल नवी दिल्लीत माध्यमांशी बोलताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी हे आवाहन केलं. सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय वाणिज्य दूतावास परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि भारतीय समुदायाच्या सदस्यांशी संपर्कात आहे, असंही ते म्हणाले.

May 14, 2025 12:24 PM

views 21

भारतात कार्यरत पाकिस्तानी कर्मचाऱ्यांना २४ तासांच्या आत भारत सोडण्याचे आदेश

भारतात कार्यरत पाकिस्तानी कर्मचाऱ्यांना २४ तासांच्या आत भारत सोडण्याचे आदेश परराष्ट्र मंत्रालयाने दिले आहेत. नवी दिल्ली इथे पाकिस्तान उच्चायोगात कार्यरत एका पाकिस्तानी कर्मचाऱ्याने आपल्या पदाला साजेसं वर्तन न केल्यामुळे त्याला काढून टाकण्यात आलं आहे. यासंदर्भात पाकिस्तान उच्चायोगाच्या प्रभारींना या आशयाचं आक्षेप पत्र जारी करण्यात आलं आहे.

May 14, 2025 12:54 PM

views 25

अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांची नावं बदलण्याच्या चीनच्या प्रयत्नाला भारताकडून निषेध

अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांची नावं बदलण्याचा निष्फळ प्रयत्न चीन अद्यापही करत असून भारत त्याचा निषेध करत आहे. अरुणाचल प्रदेश भारताचाच अविभाज्य होता, आहे आणि राहील असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

December 8, 2024 8:40 PM

views 21

सीरियातील दमास्कस इथलं भारतीय दूतावास कार्यरत – परराष्ट्र मंत्रालय

सीरियातील दमास्कस इथलं भारतीय दूतावास अजूनही कार्यरत असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. दमास्कस इथलं भारताचं दूतावास तिथल्या सर्व भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी उपलब्ध आहे, ते भारतीय नागरिकांच्या संपर्कात असून, सर्व नागरिक सुरक्षित आहेत, असंही परराष्ट्र मंत्रालयानं कळवलं आहे.  दूतावास उपलब्ध आहे.

November 10, 2024 6:05 PM

views 25

तंत्रज्ञान विषयक आणि आर्थिक सहाय्य या विषयावर ६ दिवसांच्या कार्यक्रमाचं आयोजन

राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यकारी क्षमतावाढीसाठी तंत्रज्ञान विषयक आणि आर्थिक सहाय्य या विषयावर ६ दिवसांचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. नवी दिल्ली इथं उद्या त्याचं उद्घाटन होईल. मालदीव, नेपाळ, श्रीलंका, थायलंड सह आठ देशातल्या मानवाधिकार संस्थांचे वरिष्ठ अधिकारी त्यात भाग घेणार आहेत.  वैविध्यपूर्ण प्रदेशांमधे मानवी हक्कांचं रक्षण आणि मजबुतीकरण या उद्देशाने हा कार्यक्रम होणार आहे.

August 5, 2024 1:30 PM

views 36

भारतीय नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत बांग्लादेशात प्रवास करणं टाळावं – परराष्ट्र मंत्रालय

भारतीय नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत बांग्लादेशात प्रवास करणं टाळावं असं परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं आहे. बांग्लादेशातल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयानं ही सूचना केली आहे. सध्या बांग्लादेशात असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी अत्यंत खबरदारी घ्यावी आणि राहतं ठिकाण सोडणं टाळावं तसंच ढाक्यातल्या भारतीय उच्चायुक्तालयाच्या संपर्कात राहावं असं मंत्रालयानं म्हटलं आहे.