September 18, 2024 11:02 AM

views 54

‘केंद्र सरकारने भारताचा सांस्कृतिक वारसा समृद्ध करण्यासाठी वचनबद्धता दर्शवली’

भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी सांस्कृतिक मंत्रालयाने पुढाकार घेतला असून सरकारने पहिल्या १०० दिवसांत भारताचा सांस्कृतिक वारसा समृद्ध करण्यासाठी वचनबद्धता दर्शवली असल्याची माहिती सांस्कृतिक मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. भारताने या वर्षी जुलैमध्ये दिल्ली इथं जागतिक वारसा समितीच्या 46 व्या सत्राचे यशस्वी आयोजन केले आणि त्यात आसाममधील मोईदामचा जागतिक वारसा यादीत समावेश केला असल्याची माहिती मंत्रालयाने दिली आहे.