September 18, 2025 1:24 PM

views 47

सर्व क्षेत्रांमध्ये व्यापक राष्ट्रीय सुरक्षा प्रदान करण्यासाठी सरकार वचनबद्ध-परराष्ट्र मंत्रालय

देशाचं राष्ट्रीय हित जपण्यासाठी तसंच सर्व क्षेत्रांमध्ये व्यापक राष्ट्रीय सुरक्षा प्रदान करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जयस्वाल यांनी म्हटलं आहे. सौदी अरेबिया आणि पाकिस्तान दरम्यान धोरणात्मक परस्पर संरक्षण करारावर स्वाक्षरी झाल्याच्या पार्श्वभूमीवर ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी, तसंच प्रादेशिक आणि जागतिक स्थैर्यासाठी सौदी अरेबिया आणि पाकिस्तान दरम्यान झालेल्या या कराराच्या परिणामांचा अभ्यास केला जाईल, असं ते यावेळी म्हणा...

May 22, 2025 6:29 PM

views 37

पाकिस्तानशी काश्मीरबाबतच चर्चा होईल-MEA

पाकिस्तानशी काश्मीरबाबत कोणत्याही प्रकारची चर्चा करायची असेल तर ती केवळ पाकव्याप्त काश्मीरबाबतच होईल, असं भारतानं स्पष्ट केलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी नवी दिल्ली इथं आज वार्ताहरांशी संवाद साधला. भारताने पाकिस्तानमधे असलेल्या दहशतवाद्यांची यादी पाकिस्तानला दिली होती,  त्यावर पाकिस्तान चर्चा करणार असेल तर भारत कधीही चर्चेला तयार आहे, असं जयस्वाल म्हणाले. पाकिस्तान दहशतवादाला मदत करणं थांबवणार नाही तोपर्यंत सिंधू करार स्थगित राहील असंही त्यांनी यावेळी स्पष्ट क...

May 13, 2025 7:40 PM

views 45

जम्मू काश्मीरच्या प्रश्नांबाबत भारताची भूमिका कायम – परराष्ट्र व्यवहार मंत्रालय

जम्मू काश्मीरच्या प्रश्नांबाबत भारताची भूमिका अनेक वर्षांपासून कायम असून हे प्रश्न भारत आणि पाकिस्तानला सोडवावे लागतील असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. पाकिस्तानने बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलेल्या काश्मीरची सुटका हा प्रलंबित मुद्दा असल्याचं जयस्वाल म्हणाले. ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यापासून शस्त्रसंधी होईपर्यंत भारत आणि अमेरिकेत चर्चा सुरू होती, मात्र यात व्यापाराचा मुद्दा नव्हात असं त्यांनी स्पष्ट केलं. तसंच ...

January 17, 2025 8:32 PM

views 80

रशियाच्या लष्करात कार्यरत १२ भारतीय वंशाचे नागरीक युद्धात ठार, १६ जण बेपत्ता

रशियाच्या लष्करात कार्यरत असलेले १२ भारतीय वंशाचे नागरीक युद्धात ठार झालेत तर १६ जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैयस्वाल यांनी दिली. रशियाच्या लष्करात कार्यरत असलेल्या ९६ भारतीय वंशाच्या नागरिकांना सेवेतून मुक्त केलं असून ते मायदेशी परतले आहेत.   बांगलादेशाबरोबर भारताला सौहार्दपूर्ण संबंध हवे असल्याचं जैयस्वाल यांनी सांगितलं.  अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी कार्यक्रमाला भारताकडून परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉक...