November 24, 2024 6:09 PM

views 31

जो देश आपला इतिहास जपतो, त्यांचं भविष्यही सुरक्षित असतं, प्रधानमंत्र्यांचं ‘मन की बात’मध्ये प्रतिपादन

जो देश आपला इतिहास जपतो, त्यांचं भविष्यही सुरक्षित असतं असं प्रधानमंत्री म्हणाले. याच उद्देशानं देशातल्या गावांचा इतिहास जतन करण्यासाठी एक निर्देशिका तयार करायचा प्रयत्न सुरू आहे, प्राचीन काळातील सागरी प्रवासाबद्दलच्या भारताच्या क्षमतेशी संबंधित पुरावे जतन करण्याची मोहीमही सुरू केली आहे, असं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. हा या कार्यक्रमाचा ११६ वा भाग होता. याच प्रयत्नांचा भाग म्हणून गुजरातमध्ये ल...

October 24, 2024 1:42 PM

views 59

प्रधानमंत्री २७ तारखेला ‘मन की बात’ कार्यक्रमातून नागरिकांशी संवाद साधणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या २७ तारखेला मन की बात या आकाशवाणीवरच्या कार्यक्रमातून नागरिकांशी संवाद साधणार आहेत. कार्यक्रमाचा हा ११५ वा भाग आहे. श्रोते येत्या २५ तारखेपर्यंत टोल फ्री क्रमांक, नमो ॲप किंवा मायजीओव्ही ओपन फोरम वरून आपली मतं, सूचना पाठवू शकतात.

September 29, 2024 1:26 PM

views 39

‘मेक इन इंडिया’ अभियानामुुळे भारत जगातलं महत्त्वाचं उत्पादन केंद्र बनला असल्याचं प्रधानमंत्र्यांचं ‘मन की बात’मध्ये प्रतिपादन

केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया या महत्वाच्या अभियानाला दहा वर्ष पूर्ण होत असल्याचं स्मरणही प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बात मध्ये केलं. या अभियानानं गरीब, मध्यमवर्ग तसंच सूक्ष्म, लघु, आणि मध्यम उद्योग क्षेत्राला मोठा लाभ झाला. या अभियानानं प्रत्येक घटकाला आपली प्रतिभा जगासमोर आणायची संधी दिली असं ते म्हणाले. या अभियानामुळे आज भारत उत्पादनाचं केंद्र बनला आहे, प्रत्येक क्षेत्रातली निर्यात वाढली आहे आहे असं त्यांनी सांगितलं. परकीय गुंतवणुकीचं वाढतं प्रमाण हे या अभियानाची यशोगाथा सांगतं असं ते म्ह...

July 28, 2024 7:21 PM

views 40

‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी होण्याचं प्रधानमंत्र्यांचं ‘मन की बात’ मधून आवाहन

येत्या १५ ऑगस्ट निमित्त हर घर तिरंगा अभियानात सहभागी होत संकेतस्थळावर तिरंग्यासोबतचा फोटो अपलोड करावा, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा एकशे बारावा भाग होता. हर घर तिरंगा हे अभियान तिरंग्याचा गौरव करणारा उत्सवच झाला असल्याचं ते म्हणाले.   स्वातंत्र्य दिनानिमित्त होणाऱ्या भाषणासाठी दरवर्षीप्रमाणेच यंदाही नागरिकांनी MyGov किंवा NaMo App वर सूचना पाठवण्याचं आव...

July 28, 2024 12:51 PM

views 50

‘मन की बात’ या कार्यक्रमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा जनतेशी संवाद

माझ्या प्रिय देशवासियांनो, ‘मन की बात’ या कार्यक्रमात तुमचे स्वागत आहे. तुमचे अभिनंदन करतो आहे. सध्या संपूर्ण जगावर पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धांची मोहिनी पसरलेली आहे. ऑलिम्पिक क्रीडास्पर्धा आपल्या खेळाडूंना जागतिक पातळीवर तिरंगा फडकवण्याची संधी देतात, देशासाठी काहीतरी करून दाखवण्याची संधी देतात. तुम्ही सर्वांनी सुद्धा आपल्या खेळाडूंचा उत्साह वाढवा, भारताला पाठींबा द्या!   मित्रांनो, क्रीडाविश्वातील या ऑलिम्पिकपेक्षा वेगळे असलेले गणिताच्या जगातील ऑलिम्पिक काही दिवसांपूर्वीच पार पाडले. आंतरराष्ट्र...