August 2, 2024 2:31 PM

views 57

मुंबईतल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांसाठीची परवानगी पत्रे ६ ऑगस्टपासून दिली जाणार

मुंबईतल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांसाठीची परवानगी पत्रे ६ ऑगस्टपासून दिली जाणार आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रसिद्धी पत्रकात ही माहिती देण्यात आली असून गणेश मंडळे महानगनपालिकेच्या यासाठी तयार करण्यात आलेल्या पोर्टवर जाऊन त्याची प्रक्रिया पूर्ण करु शकतील. ज्या मंडळांनी गेल्या दहा वर्षात परवानगीच्या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. त्यांना पुढील ५ वर्षांसाठी परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती महानगरपालिकेनं प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात दिली आहे. त्यांना दरवर्षी त्यांच्या पर...

August 2, 2024 10:23 AM

views 50

प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत राज्यात १ कोटी ६५ लाख ७० हजार ४३७ पीकविमा अर्ज दाखल

प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत राज्यात १ कोटी ६५ लाख ७० हजार ४३७ पीकविमा अर्ज दाखल झाल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. दरम्यान, राज्यात जुलै अखेर सुमारे ९७ टक्के पेरणी पूर्ण झाली असून पीकविमा योजनेच्या माध्यमातून १ कोटी १० लाख ५५ हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित करण्यात आलं आहे.

July 31, 2024 8:19 PM

views 41

राज्यातल्या साखर कारखान्यांसाठी केंद्र सरकारकडून १,९०० कोटी रुपये मंजूर

राज्यातल्या साखर कारखान्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सहकार विकास महामंडळानं १ हजार ९०० कोटी रुपये मंजूर केले आहे. राज्यातल्या १३ सहकारी साखर कारखान्यांना त्याला लाभ होणार आहे. त्यातले सुमारे सोळाशे कोटी महामंडळानं आज राज्य सरकारला हस्तांतरित केले.

July 31, 2024 7:25 PM

views 41

राज्यातील धरणांमध्ये पाणीसाठ्यात वाढ

राज्यात विविध ठिकाणी नद्यांच्या धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने धरणांमधे पाणीसाठा वाढला आहे. अहमदनगर जिल्ह्यात भंडारदरा धरणाच्या पाणलोट परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असून धरण ९० टक्के भरलं आहे. धरणाच्या सांडव्यातून ६०९ क्युसेक विसर्ग प्रवरा नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे भंडारदरा धरण ते निळवंडे जलाशयापर्यंत प्रवरा नदीकाठच्या रहिवाशांनी काळजी घ्यावी असं आवाहन पाटबंधारे विभागाने केलं आहे.   सांगली जिल्ह्यातल्या वारणा धरणात आज सकाळी ८ वाजेपर्यंत २९ टी.एम.सी.पेक्षा जास्त पाणीसा...

July 31, 2024 8:40 PM

views 47

जपानने राज्यात उद्योग आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात गुंतवणूक वाढवावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्र हे उद्योगस्नेही राज्य असून अनेक जपानी कंपन्या राज्यात चांगलं काम करत आहेत. जपानने भविष्यात देखील राज्यात उद्योग आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात गुंतवणूक वाढवावी, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.   जपानचे नवनियुक्त कॉन्सुलेट जनरल यागी कोजी यांनी आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. भारत आणि जपान हे आशिया खंडातले महत्वाचे देश असून दोन्ही देशांचे संबंध खूप जुने असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. जपानी कंपन्यांनी मुंबईच्या प...

July 31, 2024 6:48 PM

views 52

राज्यात एमआयडीसी उभारण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

गडचिरोली जिल्ह्यातलं देसाईगंज, अहमदनगर जिल्यातलं लिंगदेव, नाशिक जिल्ह्यातलं कळवण-सुरगणा, जांबुटके आणि अमरावती जिल्ह्यातलं वरुड इथं एमआयडीसी उभारण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. तसंच राज्यात यापुढे एमआयडीसी उभारण्यासाठी किमान शंभर एकर जमीनीची उपलब्धता करून देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातल्या त्यांच्या समिती कक्षात आज एमआयडीसी आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते.    राज्याच्या ...

July 30, 2024 7:28 PM

views 37

महिलांसाठी खुशखबर ! तीन घरगुती गॅस सिलिंडर मोफत

सरकारनं मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला असून आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा दीड हजार रुपये आर्थिक सहाय्यासोबतच वर्षभरासाठी तीन घरगुती गॅस सिलिंडर मोफत देण्यात येणार आहेत. अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागा अंतर्गत या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणं आवश्यक आहे.

July 30, 2024 8:56 PM

views 32

सरकारी वसतीगृहं आणि आश्रमशाळांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दरडोई अनुदानात भरीव वाढ

राज्यातली विविध विभागांची वसतीगृहं आणि आश्रमशाळांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दरडोई अनुदानात भरीव वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झालं. आदिम जमातीतल्या कुटुंबांसाठी आवास योजना राबवण्यासह आदिवासी सहकारी सूत गिरण्यांना दीर्घ मुदतीचे कर्ज द्यायलाही मंत्रीमंडळानं मंजुरी दिली. राज्यातल्या यंत्रमाग सहकारी संस्थांना राज्य सरकारकडून अर्थसहाय्य द्यायलाही आजच्या बैठकीत मान्यता मिळाली.   राज्य मंत्रिमंडळातील निर्णय :    • विविध विभ...

July 30, 2024 3:34 PM

views 23

रायगडमध्ये मुसळधार पावसामुळे आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू

रायगड जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे ५०० घरांची पडझड झाली आहे. मुसळधार पावसामुळे सावित्री, अंबा, कुंडलिका आदी नद्यांना पूर आल्याने आतापर्यंत ३ हजार ३८९ जणांना स्थलांतरित केलं असून शासनाकडून त्यांना सर्व प्रकारची मदत करण्यात येत आहे.   कोल्हापुरात पुराचं पाणी ओसरण्यास सुरुवात झाली असून, जनजीवन पुन्हा पूर्ववत होत आहे.   सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला, मात्र पूरस्थिती अद्याप कायम आहे. &...

July 26, 2024 9:50 AM

views 54

महाराष्ट्रात पुण्यासह अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत

महाराष्ट्रात पुणे, मुंबई, ठाण्यासह इतरही अनेक जिल्ह्यात काल पावसाचा जोर होता. पुणे शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस आणि धरणातून सुरू असलेला विसर्ग यामुळं काल शहरातील काही भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक जिल्ह्यातील नद्यांना पूर आले असून, अनेक ठिकाणी नागरी वस्तीत पाणी शिरलं आहे. त्यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे.   अनेक गावांचा संपर्क तुटला असून, राष्ट्रीय महामार्गांवरील वाहतूकही प्रभावित झाली आहे. अनेक ठिकाणी पुरामुळं नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलं आहे. ठिकठिकाणी...