August 3, 2025 2:11 PM

views 236

महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार ५ ऑगस्ट रोजी मुंबईत प्रदान करण्यात येणार

महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार येत्या मंगळवारी ५ ऑगस्ट रोजी मुंबईत प्रदान करण्यात येणार आहेत. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार गझलगायक भीमराव पांचाळे यांना प्रदान करण्यात येणार आहे. तसंच, चित्रपती व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार अभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना प्रदान करण्यात येईल.   चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना देण्यात येणार आहे. राज कपूर जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना तर राजकपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्र...

July 30, 2025 7:11 PM

views 58

रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना

रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक भरभराट आणावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज जलसंपदा विभागाला दिले. त्यांनी आज मुंबईत जलसंपदा विभागांतर्गत प्रकल्पांच्या भूसंपादनाचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. पुनर्वसित गावठाणांमध्ये सर्व नागरी सुविधांची कामं दर्जेदार करून, तिथल्या नागरिकांचं जीवनमान उंचावण्यासाठी नवीन कार्यप्रणाली तयार करावी, अशा सूचनाही  त्यांनी दिल्या.   मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी जमीन उपलब्धता आणि इतर ...

July 30, 2025 7:24 PM

views 310

पीक विम्यासाठी अर्ज करायची उद्या अंतिम मुदत

यंदाच्या खरीप आणि रबी हंगामासाठी पीक विमा योजनेसाठी आतापर्यंत केवळ ५५ हजार शेतकर्‍यांनी खरिपातल्या पिकांसाठी पीक विमा उतरविला आहे. ३१ जुलै ही पीक विम्याची अंतिम तारीख आहे. एका रुपयात पीक विमा योजनेत अनेक गैरप्रकार उघडकीला आल्यानं ती बंद करण्यात आली  आहे. यंदा पीक कापणी प्रयोगातून निघालेल्या उत्पादनावर आधारित पीक विम्याची नुकसान भरपाई मिळणार आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी पीक विमा काढून घ्यावा, असं आवाहन पुणे  कृषी विभागाकडून करण्यात आलं आहे.

July 28, 2025 3:21 PM

views 34

श्रावण सोमवार निमित्त राज्यातल्या शिवमंदिरांमधे दर्शनासाठी गर्दी

आज पहिला श्रावण सोमवार. बारा ज्योतिर्लिंगांमध्ये समावेश असलेल्या राज्यातल्या शिवमंदिरांमध्ये तसंच इतर प्रसिद्ध शिवमंदिरांमधे आज पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. मुंबईच्या बाबुलनाथ मंदिरात सकाळपासून दर्शनासाठी गर्दी झाली होती.    छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या घृष्णेश्वर, आणि इतर मंदिरांमध्ये पारंपरिक पद्धतीनं पूजाअर्चा आणि धार्मिक कार्यक्रम होत आहेत. मंदिरांना आकर्षक सजावट करण्यात आली असून, भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय, वाहनतळ, दर्शन रांगेची व्यवस्था इत्यादी सुविधाही...

July 25, 2025 3:01 PM

views 27

अर्थकारणाच्या सर्वच महत्वाच्या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र अग्रेसर असल्याचा मॉर्गन स्टॅनलेचा अहवाल

अर्थकारणांच्या सर्वच महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे, असा अहवाल मॉर्गन स्टॅनले या वित्तीय संशोधन क्षेत्रातल्या ख्यातनाम वित्तीय संस्थेने प्रकाशित केला आहे. या अहवालात महाराष्ट्र अनेक क्षेत्रांचं नेतृत्व करत असल्याचं नमूद केलं आहे. आर्थिक विकास, पायाभूत सुविधा सामाजिक न्याय, वित्तीय शिस्त, ऊर्जा क्षेत्रातील सुधारणा यांसह विविध क्षेत्रांतल्या कामगिरीची दखल यात घेतली गेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी या अहवालाचं आणि त्यातल्या निष्कर्षांचं स्वागत केलं आहे. अहवालातले हे न...

July 22, 2025 1:23 PM

views 98

7/11 Mumbai Blast : आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला राज्य सरकारचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान

मुंबईत उपनगरी रेल्वेगाड्यांमध्ये २००६मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातल्या सर्व १२ आरोपींना निर्दोष मुक्त करण्याच्या निर्णयाला महाराष्ट्र राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.  या प्रकरणावर २४ जुलै रोजी सुनावणी होईल.  मुंबईत ११ जुलै २००६ रोजी लोकल गाड्यांमध्ये सात साखळी बॉम्बस्फोट झाले होते. या बॉम्बस्फोटांमध्ये १८९ जण मृत्युमुखी पडले, तर ७०० हून अधिक जण जखमी झाले.    काल झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयानं सर्व आरोपींबाबतचा सत्र न्यायालयाचा निकाल रद्द करून त्यांची तातडीनं सुटक...

July 21, 2025 7:52 PM

views 36

येत्या २४ तासांत पालघर वगळता कोकणात मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे.     पावसाला अनुकूल वातावरण निर्माण झाल्यामुळे येत्या २४ तासांत पालघर वगळता कोकणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून या भागाला ऑरेंज अलर्ट दिला आहे.  या काळात वाऱ्यांचा वेग वाढण्याची शक्यता असून मच्छिमारांनी समुद्रात न जाण्याचा सल्ला हवामान विभागानं दिला आहे.  मुंबई प्रादेशिक हवामान विभागाच्या शुभांगी भुते यांनी सांगितलं.   दरम्यान, आगामी ४८ तासांसाठी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर ठाण...

July 19, 2025 6:30 PM

views 25

राज्यात ३५७ ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्याला नवीन इमारती मिळणार

राज्यात ३५७ ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्याला नवीन इमारती मिळणार आहेत. जिल्हा वार्षिक योजनेतून इमारत बांधकामासह दवाखान्याची दुरूस्ती, स्वच्छतागृह आणि उपकरण खरेदीसाठी साडे चारशे कोटी रुपयांहून अधिक तरतूद झाली आहे.    

July 18, 2025 8:01 PM

views 71

‘जनसुरक्षा विधेयक’ हे लोकशाही पद्धतीनं तयार केलं गेलं – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जनसुरक्षा विधेयक हे लोकशाही पद्धतीने, विरोधी पक्षांच्या सदस्यांचं म्हणणं ऐकून घेऊन तयार केलं गेलं, याबाबतच्या समितीतल्या कुणीही असहमती दर्शवली नाही, मात्र विरोधकांनी नंतर दबाव आल्यामुळे सभागृहात वेगळी भूमिका घेतली, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी पावसाळी अधिवेशनानंतर वार्ताहरांशी बोलताना केला.   जनसुरक्षा कायद्यात कसलीही स्पष्टता नसल्यानं त्याचा गैरवापर होण्याची शक्यता आहे, त्यामुळे या कायद्याला विरोध असल्याचं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, या विधेयकाच्या विर...

July 18, 2025 7:04 PM

views 192

विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित, हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासून नागपुरात

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचं कामकाज आज संस्थगित झालं. विधिमंडळाचं यापुढचं, हिवाळी अधिवेशन नागपुरात ८ डिसेंबर पासून सुरू होणार आहे.    या अधिवेशनात विधानसभेच्या एकूण १५ बैठका झाल्या यात १३३ तास ४८ मिनिटं कामकाज झालं. अधिवेशन काळात १४ विधेयकं पुनर्स्थापित झाली, तर १५ विधेयकं संमत झाली. एक विधेयक मागं घेण्यात आलं. अधिवेशनात विधानसभा सदस्यांची उपस्थिती ८२ दशांश २३ टक्के इतकी राहिली.   विधानपरिषदेच्या १५ बैठका झाल्या, त्यात एकंदर १०५ तास, म्हणजे दररोज सरासरी ७ तास चर्चा झाल्याचा माहिती ...