October 22, 2025 3:00 PM

views 99

राज्यात पुन्हा पाऊस बरसणार, ‘येलो अलर्ट’ जारी

मराठवाडा आणि विदर्भाचा काही भाग वगळता राज्याच्या बहुतांश भागासाठी हवामान विभागानं आज आणि उद्यासाठी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. या काळात राज्यात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेनं व्यक्त केला आहे. तर काही ठिकाणी विजांचा कडकडाट तसंच सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता देखील वर्तवली आहे.

October 5, 2025 7:07 PM

views 78

राज्यात पावसाची हजेरी, पिकांचं नुकसान

धाराशिव जिल्ह्यात गेल्या आठ दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसानं जिल्ह्यात पुन्हा जोरदार हजेरी लावली असून भूम वाशी आणि कळंब तालुका परिसरात जोरदार पाऊस बरसला. नद्यांचं पाणी वाढल्यानं अनेक गावांकडे जाणारे रस्ते बंद आहेत. सध्या पावसाचा जोर ओसरला असून वातावरण ढगाळ आहे. मांजरा धरणातून पंधरा हजार क्युसेक वेगानं विसर्ग देखील सुरू करण्यात आला आहे. सापनाई इथं आज मुसळधार पाऊस झाल्यानं ओढे-नाले भरुन वाहू लागले. शेतात पाणी घुसल्यानं जमीन खरडून गेली.   भंडारा जिल्ह्यात आठ दिवसाच्या विश्रांती नंतर आज व...

September 29, 2025 3:12 PM

views 74

राज्यात सरासरीच्या तुलनेत ११७ % पाऊस

राज्यात सरासरीच्या तुलनेत ११७ टक्के पाऊस झाला आहे. कोल्हापुरातला ८५ टक्के आणि अमरावती, रायगड तसंच नाशिकमधला सुमारे ९५ टक्के वगळता इतर सर्व जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक १७० टक्क्यांहून अधिक पाऊस सांगलीत झाला. जळगावमध्ये सरासरीच्या १४१ टक्के पावसाची नोंद झाली आहे.    गेल्या २४ तासात पालघर जिल्ह्यात १७६ मिलीमीटर तर मुंबई शहरात १०१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

September 28, 2025 7:00 PM

views 145

राज्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती कायम

राज्यात अनेक ठिकाणी आजही मुसळधार पाऊस होत असून अनेक ठिकाणी पूरस्थिती कायम आहे. छत्रपती संभाजीनगर शहरासह मराठवाड्याच्या काही भागात मुसळधार होत असून कन्नड तालुक्यातल्या शिवना नदीला पूर आला आहे. अहिल्या नगर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून विविध प्रकल्पांमधून मोठा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. शहराच्या जवळून वाहणाऱ्या सीना नदीला आलेल्या पुराचं पाणी थेट शहरात घुसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. आपत्ती निवारण कक्षाच्या सहाय्यानं बचावकार्य सुरू असून होड्यांधून नागरिकांची सुट...

September 16, 2025 3:57 PM

views 55

राज्यात पावसाचा जोर कायम

राज्यात अनेक ठिकाणी अद्याप पावसाचा जोर आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण, सिल्लोड, गंगापूर, सोयगाव, खुलताबाद तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. जिल्ह्यातल्या दहा मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. सिल्लोड तालुक्यातल्या घटनांद्रा इथल्या नदी नाल्यांना पूर आला आहे. ढगफुटी सदृश पावसामुळे अनेक गावांचा संपर्क देखील तुटला आहे.   कन्नड तालुक्यात पिशोर इथं काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे खडकी नदीला पूर आला आहे. आसपासच्या परिसरातल्या अनेक घरांमध्ये पाणी शिरलं असून, मोठ...

August 28, 2025 4:49 PM

views 54

राज्यातल्या काही भागात अतिवृष्टी, पुणे-सातार-कोल्हापूरला हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट

जोरदार पावसामुळे राज्यातल्या काही भागात पूर परिस्थिती आणि पडझडीच्या घटना घडल्या आहेत. पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट परिसराला हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसंच प्रशासनातर्फे NDRF आणि SDRF यांना आपत्कालीन परिस्थितीकरता सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.   नांदेड जिल्ह्यात पुन्हा एकदा पूर परिस्थिती गंभीर झाली आहे. जिल्ह्यातील बिलोली, मुखेड, कंधार, नायगाव, लोहा या चार तालुक्यातील १७ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. नदीकाठच्या गावातल्या  लोकांना सुरक्षित जागी स्थला...

August 20, 2025 9:00 PM

views 219

ठाणे, पुणे, नाशिक आणि सातारा जिल्ह्याला हवामान विभागाचा रेड अलर्ट

राज्यात मुंबई आणि रत्नागिरीत पावसाचा जोर आज सकाळपासून ओसरू लागला आहे. मात्र अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम असल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयातल्या राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.    नवी मुंबई क्षेत्राला पाणीपुरवठा करणारे मोरबे धरण १०० टक्के भरले आहे. आज पहाटे मोरबे धरणाचे दरवाजे २५ सेंटिमीटर उघडण्यात आले असून पाण्याचा विसर्ग धावरी नदीच्या पात्रात सोडण्यात आला आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये असं आवाहन नवी मु...

August 20, 2025 9:37 AM

views 50

मुसळधार पावसामुळे राज्यात २१ जणांचा मृत्यू

गेल्या चार दिवसांत महाराष्ट्रात पाऊस आणि पूर संबंधित घटनांमुळे किमान २१ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, कोकण आणि महाराष्ट्राच्या इतर भागात सलग चौथ्या दिवशीही मुसळधार पाऊस सुरू आहे. पुराचा गंभीर परिणाम असलेल्या नांदेड जिल्ह्यात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत सुमारे 300 मिमी विक्रमी पाऊस झाला असून त्यामुळे शहरातील सामान्य जनजीवन विस्कळीत झालं आहे.   हवामान खात्याने आज विदर्भ प्रदेशाला रेड अलर्ट जारी केला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव, पुणे आणि...

August 19, 2025 7:29 PM

views 71

राज्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

  मुंबई शहर आणि उपनगरांत जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या रुळांवर पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला. अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या. शहरातल्या अनेक रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतूक ठप्प झाली. बेस्ट बसगाड्यांचे मार्ग वळवण्यात आले.      ठाणे जिल्ह्यात भिवंडी, मुंब्रा भागात अनेक घरांमध्ये पाणी शिरलं, तसंच वाहतुकीलाही फटका बसला. हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यात पुराच्या पाण्यात अडकलेल्या ८ नागरिकांची सुटका करण्यात आली.      सोलापूर जिल्ह्यात गेल्या दहा-बारा...

August 18, 2025 7:06 PM

views 65

मुख्यमंत्र्यांकडून परिस्थितीचा आढावा, नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश

राज्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज संपूर्ण राज्यातल्या पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. आणि सर्व यंत्रणांना सतर्क राहायचे निर्देश दिले. गेल्या दोन दिवसांत पावसाशी संबंधित विविध घटनांमध्ये सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली.   राज्याच्या विविध भागांमधल्या परिस्थितीची तपशीलवार माहिती देऊन, रत्नागिरी, रायगड आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये जास्त पाऊस झाला असून तिथल्या नागरिकांनी पुढचे काही दिवस सतर...