July 22, 2024 2:45 PM

views 32

लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून आशिष मिश्रा यांना जामीन मंजूर

उत्तरप्रदेशातल्या लखीमपूर खेरी इथं २०२१ साली झालेल्या हिंसाचार प्रकरणी माजी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशीष मिश्रा याला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र आशीष मिश्रा याला दिल्ली किंवा लखनौ च्या बाहेर जायला मज्जाव करण्यात आला आहे. सत्र न्यायालयाने याप्रकरणी लवकर सुनावणी घ्यावी असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. लखीमपूर खेरी इथं झालेल्या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला होता.