November 17, 2025 7:52 PM

views 495

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना KYC करण्यासाठी मुदतवाढ!

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी करण्यासाठी राज्य सरकारनं ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे. त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे e-kyc करावे आणि पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाच्या आदेशाची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातल्या महिला आणि बाल विकास अधिकाऱ्यांकडे जमा करावी, असं आवाहन महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

January 21, 2025 8:34 AM

views 61

लाडकी बहीण योजना बंद होणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

लाडकी बहीण योजना बंद होणार नसून, ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाख रुपयांच्या आत आहे, त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत राहील, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते काल जालन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. सरकारनं तीन हजार ७०० कोटी रुपयांचा धनादेश महिला आणि बालविकास खात्याकडे दिला असून, अनेक महिलांच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असल्याचं, पवार यांनी सांगितलं. दरम्यान, जालना इथल्या प्रशासकीय इमारतीसह नियोजन भवनाच्या कामाची पाह...

October 5, 2024 9:05 PM

views 50

लाडकी बहीण योजना बंद करण्याची कोणामध्येही हिंमत नाही-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन

लाडकी बहीण योजना बंद करण्याची हिंमत कोणामध्येच नाही. राज्य सरकारनं घेतलेल्या विविध निर्णयांमुळं आपलं सरकारं हे लाडकं सरकार झालं आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नेहमीच राज्याला भरभरून देतात आणि आमच्याकडून काम करुन घेतात, असं ते म्हणाले. आज दिवस आनंदाचा असून सुवर्ण अक्षरात लिहून ठेवण्याचा आहे. यामुळं खऱ्या अर्थानं बंजारा समाजाची काशी इथं उभी राहिली असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

August 25, 2024 3:28 PM

views 63

लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र महिलांना लाभ मिळणार – मंत्री अदिती तटकरे

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ३१ जुलै नंतर आलेल्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सुरू असून पात्र महिलांना लवकरच लाभ मिळणार असल्याचं महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे. अर्जांची प्रक्रिया जिल्हास्तरावर सुरू असून प्रशासकीय मान्यतेनंतर पात्र महिलांची माहिती विभागाकडं येते. त्यानंतर ही यादी बँकेकडे पाठवली जाते असं त्या म्हणाल्या.   आतापर्यंत राज्यभरातून या योजनेसाठी २ कोटी ६ लाख १४ हजार ९९० अर्ज प्राप्त झाले. यापैकी १ कोटी ४७ लाख ४२ हजार ४७६ अर्ज पात्र ठरले. तर ४२ हज...