August 21, 2024 8:10 PM

views 45

महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे कांदा, कापूस, साेयाबीनसह अन्य प्रश्न साेडवण्याची केंद्रीय कृषी मंत्र्यांची ग्वाही

महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे कांदा, कापूस, साेयाबीनसह अन्य प्रश्न साेडवण्यासाठी बैठक घेतली जाईल तसेच महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळेल, पिक विमा दिला जाईल, अशी ग्वाही केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चाैहान यांनी दिली आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागानं बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ इथं आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचं उद्घाटन आज चौहान यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बालत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि अजित पवार, राज्याचे कृषी मंत्री धनंजय ...