July 15, 2025 3:39 PM

views 29

अनधिकृत कत्तलखान्यांवर तातडीनं कारवाई करण्याचे निर्देश

अनधिकृत कत्तलखाने असताच कामा नये, अशी शासनाची भूमिका असून अशा कत्तलखान्यांवर तातडीनं कारवाई करायचे निर्देश पोलिसांना देऊ, असं आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी आज विधानपरिषदेत दिलं. आमदार विक्रांत पाटील यांनी मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातल्या अवैध कत्तलखान्यांमधलं रक्तमिश्रित पाणी नदीसंगमात सोडलं जात असल्याबाबतची लक्षवेधी सभागृहात उपस्थित केली, त्याला ते उत्तर देत होते.   नाशिक इथं होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीतही असं रक्तमिश्रित पाणी सोडलं जात असल्याचा मुद्दा पाटी...