October 18, 2025 3:13 PM

views 118

पत्रकाराला मारहाण केल्याप्रकरणी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांना दंड

पत्रकाराला मारहाण केल्याप्रकरणी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांना अलिबाग जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवून पाच हजार रुपये दंड ठोठावला आहे. तसंच एक वर्षाचं चांगल्या वर्तणुकीचं हमीपत्र लिहून देण्याचा आदेश दिला आहे. २०१९ च्या निवडणुकीत वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या हर्षद कशाळकर या पत्रकाराला जयंत पाटील यांनी मारहाण केली होती.

July 12, 2025 7:49 PM

views 50

जयंत पाटील यांच्या राजीनामाच्या वृत्ताचं जितेंद्र आव्हाड यांच्याकडून खंडन

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पदाचा राजीनामा दिल्याच्या बातम्या काही प्रसारमाध्यमांनी दिल्या होत्या. मात्र, पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी या बातम्या म्हणजे निव्वळ खोडसाळपणा असल्याचं समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. जयंत पाटील हेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. पक्ष एका नियमानुसार आणि शिस्तीनुसार चालतो, असंही त्यांनी नमूद केलं आहे.

June 10, 2025 3:53 PM

views 160

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची पदाचा राजीनामा देण्याची तयारी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखवली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी अशी विनंती त्यांनी केली. पुण्यात आयोजित पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात ते बोलत होते. सात वर्षांपासून ते प्रदेशाध्यक्ष आहेत. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करा. राज्य चालवणारं नवीन नेतृत्व निर्माण करण्यासाठी काम करा असं आवाहन शरद पवार यांनी यावेळी उपस्थितांना केलं.

November 11, 2024 7:14 PM

views 51

जीएसटीच्या माध्यमातून वसूल केलेले पैसे लाडकी बहीण योजनेद्वारे वाटले – जयंत पाटील

महायुती सरकारच्या काळात जीएसटीच्या माध्यमातून जनतेकडून पैसे वसूल करून तेच लाडकी बहीण योजनेद्वारे वाटले गेले, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरच्चंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. ते आज पुणे जिल्ह्यातल्या पर्वती मतदारसंघातल्या प्रचारसभेत बोलत होते. महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर महागाई कमी करू असं आश्वासन पाटील यांनी दिले. 

August 29, 2024 3:28 PM

views 51

राज्यात कणा नसलेले सरकार असल्याची जयंत पाटील यांची टीका

हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातल्या तलाठ्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून हत्या केल्याच्या घटनेवरून राज्यात कणा नसलेले सरकार असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. ते मुंबईत बोलत होते. राज्यातल्या महिला, मुली, सामान्य नागरिक सुरक्षित नव्हतेच पण आता राज्यातले शासनाचे अधिकारी सुरक्षित नसल्याचं त्यांनी समाजमाध्यमांवरील पोस्ट मध्ये म्हटलं आहे.

August 28, 2024 4:50 PM

views 52

महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून राजकोट किल्ल्यावरील पुतळ्याची पाहणी

राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवरायांचा केवळ पुतळा पडला नसून महाराष्ट्राचा स्वाभिमान पडला आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरच्चंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. जयंत पाटील यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत राजकोट किल्ल्याला भेट दिली. त्यापूर्वी वार्ताहरांशी संवाद साधताना पाटील बोलत होते.  पुतळा बनवण्याचं काम अपरिपक्व माणसाला दिलं होतं, याची जबाबदारी सरकारला झटकता येणार नाही, असं पाटील म्हणाले. या प्रकरणाची चौकश...

July 15, 2024 7:07 PM

views 44

महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्याच्या आधारे शहरी नक्षलवादाच्या नावाखाली पुरोगामी चळवळींना लक्ष्य करण्याचा सरकारचा उद्देश – जयंत पाटील

प्रस्तावित महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्याच्या आधारे शहरी नक्षलवादाच्या नावाखाली पुरोगामी चळवळींना लक्ष्य करण्याचा सरकारचा उद्देश आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. ब्रिटिश सरकारनं स्वातंत्र्यपूर्व काळात आणलेल्या रैालेट ॲक्टच्या धर्तीवर आधारलेला हा कायदा सरकार अध्यादेशाद्वारे आणत असल्याचं पाटील यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे. या कायद्याद्वारे पोलिसांना अमर्याद अधिकार दिले जाणार असून कोणतंही कारण न दाखवता ते एखाद्या संघटनेला ‘बेकायदेशीर’...

June 23, 2024 3:39 PM

views 59

विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशपरीक्षा राज्यपातळीवर घेण्याची जयंत पाटील यांची मागणी

विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशपरीक्षा राज्यपातळीवर घेण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश परीक्षा म्हणजेच नीट-पीजी पुढे ढकलल्याबद्दल त्यांनी  केंद्र सरकारवर टीका केली आहे.   विविध प्रवेशपरीक्षांवरच्या आक्षेपांच्या पार्श्वभूमीवर आजची नीट-पीजी  रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.  विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे आणि परीक्षेचं सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर ...