February 20, 2025 8:36 PM

views 42

ICC क्रिकेट : बांगलादेशाचं भारतापुढं विजयासाठी २२९ धावांचं लक्ष्य

आयसीसी चँपियन्स करंडक क्रिकेट स्पर्घेत आज दुबईत सुरु असलेल्या सामन्यात बांगला देशानं भारतापुढं विजयासाठी २२९ धावांचं लक्ष्य ठेवलं आहे.    बांगलादेशानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला. मात्र त्यांची सुरुवात खराब झाली. ९व्या षटकात ५ बाद ३५, अशी त्यांची स्थिती झाली. मात्र त्यानंतर तोव्हिद हृदोय आणि जाकीर अली यांनी डाव सावरला. त्यांनी सहाव्या गड्यासाठी १५४ धावांची भागिदारी केली. तोव्हीदनं शतक झळकावलं, तर जाकीरनं ६८ धावा केल्या. मात्र इतर फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही....