June 29, 2024 9:44 AM

views 78

नागरी विमानवाहतुकीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर

देशांतर्गत विमानवाहतुकीत भारत जगातील तिसरा देश ठरला आहे. अमेरिका आणि चीननंतर भारतानं हा मान मिळवला आहे. ऑफिशिअल एअरलाइन गाइड म्हणजे ओएजी या विमानवाहतुकीबाबत विश्लेषण करणाऱ्या संस्थेनं ही माहिती दिली आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता, इंडिगो आणि एअर इंडियासारख्या कंपन्यांनी त्यांच्या ताफ्यात वाढ केल्यामुळे भारताचं स्थान पुढे गेल्याचं नमूद करण्यात आलं आहे.   भारतात विमानांमधील आसनांची क्षमता एप्रिल २०१४ मध्ये ७९ लाख होती, ती एप्रिल २०२४ मध्ये एक कोटी ५५ लाख इतकी झाल्याचं ओएजीनं म्हटलं ...