October 10, 2024 8:55 AM

views 75

महिलांच्या टी-ट्वेंटी विश्व करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताचा श्रीलंकेवर विजय

महिलांच्या टी-ट्वेंटी विश्व करंडक क्रिकेट स्पर्धेत भारतानं श्रीलंकेवर काल दुबई इथं 82 धावांनी विजय मिळवून एक विक्रम केला. त्यामुळं अ गटात भारत क्रमवारी आणि धावसंख्येच्या प्रमाणात वरचढ ठरला आहे. हरमनप्रीत कौर आणि स्मृती मन्धना यांच्या अर्धशतकांच्या बळावर भारतानं केलेल्या 172 धावांचा पाठलाग करताना श्रीलंका संघ विसाव्या षटकात सर्वबाद 90 धावा करु शकला.