November 30, 2024 2:31 PM

views 50

बांगलादेश सरकारनं अल्पसंख्याक नागरिकांच्या संरक्षणासाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलावीत – भारत सरकारचं आवाहन

बांगलादेश सरकारनं अल्पसंख्याक नागरिकांच्या संरक्षणासाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलावीत, असं आवाहन भारत सरकारनं केलं आहे. हिंदू आणि इतर अल्पसंख्यांक नागरिकांना दिल्या जाणाऱ्या धमक्या आणि त्यांना लक्ष्य करत त्यांच्यावर होणारे हल्ले, हे मुद्दे भारतानं प्रकर्षानं मांडल्याचं, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी काल दिल्लीत सांगितलं. बांगलादेश सरकारनं सर्व अल्पसंख्यांक नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडली पाहिजे, अशी भारताची स्पष्ट भूमिका असल्याचं ते यावेळी म्हणाले. बांगलादे...

October 13, 2024 3:23 PM

views 73

भारताचं बांगलादेश सरकारला हिंदू आणि सर्व अल्पसंख्याक आणि त्यांची प्रार्थनास्थळे, सुरक्षितत करण्याचे आवाहन

भारतानं बांगलादेश सरकारला हिंदू आणि सर्व अल्पसंख्याक आणि त्यांची प्रार्थनास्थळे, विशेषत: सणासुदीच्या काळात सुरक्षितता आणि सुरक्षा करण्याचे आवाहन केलं आहे. एका निवेदनात परराष्ट्र मंत्रालयानं ढाका येथील तंतीबाजार येथील पूजा मंडपावर झालेला हल्ला आणि सातखीरा येथील पूजनीय जेशोरेश्वरी काली मंदिरात झालेल्या चोरीबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. हे हल्ले खेदजनक असून मंदिरे आणि देवतांची विटंबना आणि नुकसान जाणीवपूर्वक केलं जात असल्याचं भारतानं म्हटलं आहे.