March 31, 2025 8:43 PM

views 20

महायुतीच्या सरकारच्या काळात राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर-हर्षवर्धन सपकाळ

महायुतीच्या सरकारच्या काळात राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. बीडमध्ये गुंडाराज आले असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहखात्याचा मोह सोडून राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.